वेश्या व्यवसायात नेपाळी महिला असतात ; कारण ‘बादी समाज’ वर आणलेली अवस्था..
देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात वेश्या व्यवसाया संदर्भात बातमी आली तरी त्यात पकडण्यात येणाऱ्या महिला या नेपाळच्या असतात. नेपाळच्या महिला वेश्याव्यवसायात असण्याला तिथली आर्थिक परिस्थिती जबाबदार असल्याचे सांगितलं जात.
आजही देशातील सगळ्या वेश्या वस्तीत नेपाळी स्त्रिया जास्त असल्याचे पाहायला मिळतं. भारतात अनेक वर्ष दासी प्रथा होती. ज्यात राजे महाराजे, मोठी लोक हे दासी ठेवत. त्याच प्रमाणे नेपाळ मध्ये राजे महाराजे बादी समाजातील स्त्रियांना दासी ठेवत. मात्र काही काळानंतर बादी समाजाचा राजाश्रय काढून घेण्यात आला.
त्यामुळे बादी समाजातील महिला वेश्या व्यवसायाकडे वळल्याचे पाहायला मिळते.
बादी समाज
बादीचा अर्थ होतो वाद्य वाजविणारे. बादी समाज हा मूळचा भारतातील असल्याचे सांगितलं जात. १८ व्या शतकात उत्तर भारतातून ते नेपाळ मध्ये गेले. नेपाळ मधील पश्चिम भागात हे लोक स्थानिक झाले. रोजगारासाठी हे लोक मनोरंजनाचे काम करायचे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन नाच, गाणे म्हणायचे काम बादी समाजातही करायचे. तर काही जण मासेमारी, मातीची भांडी तयार करण्याचे काम करायचे.
यानंतर सल्यान, जाजरकोट व मुसीकोट येथील पहाडी राजांच्या दरबारात बादी समाजातील स्त्रिया मनोरंजनाचे काम करू लागल्या. या राजाचे संरक्षण बादी समाजातील लोकांना मिळाले. यामुळे बादी समाजातील स्त्रियांचा वावर राज महालांमध्ये वाढला.
या महिला पुढे जाऊन दासी तर बनल्या आणि मोठ्या लोकांसाठी रेक्स वर्कर म्हणून काम करू लागल्या.
१९५० मध्ये असं झालं की पहाडी राज्यांनी बदी समाजाला दिलेला राजाश्रय काढून घेतला. यामुळे या समाजाचे महत्व कमी झाले. मनोरंजनाच्या कार्यक्रमाशिवाय बादी समाजातील महिलांना दुसरे काम येत नव्हते. राजाश्रय काढून घेतल्याने या समाजाचे महत्व कमी-कमी होत गेले.
यामुळे हळूहळू बादी समाजातील महिला या वेश्या व्यवसायाकडे ओढल्या गेल्या. हेच काम त्यांच्या घरच्यांचे मुख्य आर्थिक स्रोत बनले. त्यामुळे घरच्यांनी सुद्धा कधी विरोध केला नाही. यानंतर बादी समाजातील महिला या भारता सारख्या देशात येऊन वेश्याव्यवसाय करू लागल्या.
बादी समाजा हा नेपाळ मध्ये अस्पृश्य समजला जात होता. या समाजाला जाती व्यवस्थेंचा बराच फटका बसल्याचे सांगितलं जात. बादी समाजाच्या लोकसंख्या ६० हजार असल्याचे सांगितलं जात. समाजातील संख्येपैकी १५ टक्के महिला या वेश्याव्यवसायात असल्याचे सांगण्यात येत.
एका रिपोर्ट नुसार नेपाळ मधील ३८ टक्के जनता ही दारिंद्र रेषेखाली जगत आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहेत. अनेकवेळा पूर, दुष्काळ यामुळे शेतीतील नापिकी सारख्या गोष्टींमुळे इतर क्षेत्राकडे इथलं लोक वळले.
रोजगारांच्या कमी संधी असल्यामुळे आपल्या मुलांनी शहराकडे स्थलांतरित व्हावे यासाठी कुटुंबीय आग्रही असतात. यातूनच नेपाळ मधील अनेक महिला आणि तरुणी वेश्याव्यवसायाकडे वळत असल्याचे सांगितलं जात.
नेपाळ मधून सर्वाधिक महिला आणि मुलांचं ट्रॅफिकिंग करून भारतात आणलं जात. इतर देशाच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. नेपाळ मधील ७५ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यातून मुली, महिलांची तस्करी होते. यात दलित समाजातील महिलांच्या आणि उच्च वर्णीय समजल्या जाणाऱ्या जातीतील महिलांचा पण सहभाग असल्याचे सांगितलं जातं.
भारता बरोबर गल्फ देशांमध्ये सुद्धा नेपाळ मधून महिलांना वेश्याव्यवसायासाठी नेलं जात.
यासाठी ९ ते १६ वय वर्षे असणाऱ्या मुली निवडल्या जातात. जे दलाल असतात ते या मुलींना बॉर्डर पर्यंत आणतात. बॉर्डर पास करण्यासाठी एजेंट नेमलेले असतात. ते वेश्यालयात या मुलींना विकतात. काही ठिकाणी तर मुलींचे कुटुंबीय हे ट्रॅफिकिंग काम केल्याची उदाहरणे आहेत.
जून ते ऑगस्ट या महिन्यात भारतात असणारे दलाल, महिला या नवीन मुलींना विकत घेण्यासाठी नेपाळला जातात. याच महिन्यात मुलींना विकत घ्यायला जायचं कारण म्हणजे नेपाळ मधील गावांमध्ये आर्थिक अडचण जास्त असते. कमी पैशांमध्ये व्यवहार होत असल्याने दलालांकडून या महिन्यात नेपाळ जातात.
२०१५ साली नेपाळ मध्ये आलेल्या भूकंपानंतर वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली.
नेपाळ मधून वेश्याव्यवसाय करण्यासाठी भारतात दररोज ५० ते ५५ महिला, मुली येतात. त्यांना वेगवेगळ्या मार्गाने इथं आणलं जात. ह्युमन ट्रॅफिकिंग रोखण्यासाठी २००७ मध्ये नेपाळ मध्ये कायदा आणण्याचा प्रयत्न झाला होता.
हे ही वाच भिडू
- जेव्हा नेपाळच्या पाकिस्तानी एजंटला संपवण्यासाठी भारताचे दोन “डॉन” वापरण्यात आले…
- नेपाळी नाक म्हणून तिला चिडवलं गेलं पण पुढे ती नॅशनल क्रश बनली होती….
- एकदा शेट्टी अण्णानं १२८ नेपाळी वेश्यांना मदत करुन शानपट्टीचं काम केलेलं.