दहशतवाद्याला दुबईतून आणण्यासाठी CBI ऑफिसर कॉकपिटमध्ये बसण्याचा हट्ट करत होते..
हा किस्सा आहे २००२ सालचा. राजधानी दिल्लीमध्ये Joint Intelligence Committee Office मध्ये एक गुप्त मिटिंग सुरु होती. कोलकातामधल्या अमेरिकन सेंटरवर हल्ला झाला होता. अमेरिका आणि भारत दोन्ही देश या घटनेच्या मागावर होते. जगभरातल्या गुप्त संघटना अमेरिका सेंटरवर हल्ला करणाऱ्या मुख्य सूत्रधार असणाऱ्या आफताब अंसारी उर्फ फरहान मलिकच्या मागावर होत्या.
भारत अमेरिकेच्या गुप्त संघटना आफताब अंसारीची एक झलक पाहण्यासाठी उताविळ झालेल्या होत्या. यात सीबीआय कशी काय मागे राहील. २००२ दिल्लीमध्ये जी मिटिंग झाली त्या मीटिंगमध्ये १९७६ बॅचचे आयपीएस ऑफिसर अर्थात सीबीआयचे ज्वाइंट डायरेक्टर सुद्धा सामील होते. मिटिंग चालू असतानाच त्यांना दुबईतील गुप्तहेराकडून समजले कि
तुम्हाला जो माणूस हवा आहे तो दुबईत ताब्यात आहे, कागदपत्रांचे दस्तावेज घेऊन लवकरात लवकर दुबई गाठा.
ज्या गुप्तहेरांकडून माहिती मिळाली होती त्यावर सीबीआयच्या जॉईंट डायरेक्टरला विश्वास नव्हता म्हणून त्यांनी थेट भारताचे दुबईतले राजदूत के.सी.सिंह यांना फोन करून बातमी कन्फर्म केली. ज्या आफताब अंसारीला शोधण्यासाठी सीबीआयच्या जॉईंट डिरेक्टरने जीवाचं रान केलं होतं ते स्वतः त्याला ताब्यात घेण्यासाठी जाणार होते.
पण यात एक गडबड झाली होती. आफताब अंसारीला पकडण्यासाठी सीबीआयचे जॉईंट डारेक्टर स्वतः तातडीने जाणार होते पण दुबईच्या फ्लाईटची वेळ निघून चालली होती. सीबीआय मुख्यालयाला भारत सरकारकडून हिरवा कंदील मिळताच ते दुबईला जाण्यासाठी रवाना झाले.
पण अडचण हि होती कि आफताब अंसारीला सुरक्षितरित्या भारतात कसं आणता येईल. मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारराला भारतात आणण्यात जोखीम होती. हि माहिती जितकी गुप्त राहील तितक्या लवकर आफताब अंसारीला भारतात आणणं गरजेचं होतं.
आफताब अंसारी हा कुख्यात गुन्हेगार होता, दुबईत त्याचे कॉन्टॅक्ट जबरदस्त होते म्हणून तो पळून जाण्याच्या शक्यता जास्त होत्या म्हणून त्याला भारतात लवकरात लवकर आणणं जिकिरीचं झालं होतं. त्यामुळे सीबीआयच्या लोकांचं एकच लक्ष्य होतं कि आफताब अंसारीला भारतात घेऊन येणं मग बाकीची प्रकरणं. त्याच वेळी सीबीआयचे जॉईंट डिरेक्टर इंदिरा गांधी विमानतळावर पोहचले.
विमानतळावर पोहचताच बातमी आली कि दुबईला जाणारी फ्लाईट टेक ऑफ करण्यासाठी सज्ज आहे. त्या विमानात एकही सीट उरलेली नव्हती, सगळ्या सीट आरक्षित होत्या, प्रवासी येऊन बसलेले होते. बुडत्याला काडीचा आधार अशी गत झाली होती. सीबीआयच्या जॉईंट डिरेक्टरला कळून चुकलं होतं कि हि फ्लाईट आपल्याला दुबईला घेऊन जाऊ शकत नाही. पण त्यांनी एअर लाईन्सच्या अधिकाऱ्यांना आदेश दिला कि,
जो पर्यंत हि फ्लाईट मला दुबईला घेऊन जाण्याचा निर्णय घेत नाही तोवर हि फ्लाईट इथून टेकऑफ करणार नाही.
पण अधिकाऱ्यांनी ओळख विचारली तेव्हा सीबीआयचा अधिकारी आहे अशी ओळख सांगणं चुकीचं ठरलं असतं आणि पण कसबसं करून त्यांनी त्यांना पटवलं. ते सीबीआय जॉईंट अधिकारी होते नीरज शर्मा. शेवटी वैतागून ते म्हणाले कि
मला पायलटच्या शेजारी बसून न्या किंवा कॉकपीटमध्ये बसवा पण माझं दुबईला जाणं फार गरजेचं आहे.
शेवटी नीरज शर्मा कॉकपीटमध्ये बसून दुबईला गेले आणि सुरक्षित रित्या आफताब अंसारीला भारतात घेऊन आले. हि घटना २० वर्षानंतर नीरज शर्मानी सांगितली होती.
हे हि वाच भिडू :
- या तीन राज्यांनी थेट सीबीआयवर बंदी घालण्याच धाडस दाखवलं होतं.
- १०० कोटी रुपये वसुली प्रकरणातील नाट्यमय घडामोडी अनिल देशमुखांची अडचण वाढवणार का?
- एक वादग्रस्त कार्टून आणि त्यानंतर सुरु झाला जगातला सर्वात मोठा रक्तपाताचा खेळ=
- मोठी दाढी ठेवल्याच्या कारणावरून कॉमेंटेटर हाशिम अमलाला आतंकवादी म्हणाला होता