सगळ्या जगातले मोबाईल महाग होत चाललेत यामागं चीन आणि तैवानमधली भांडणं आहेत

स्मार्टफोन तर आपण सगळेच वापरतो.  मग तो आयफोन असो किंवा अँड्राॅइड. पण त्यातल्या लहान-सहान टेक्निकल गोष्टींबाबत  आपल्यातल्या अनेकांना काहीच माहित नसेल. त्यातलाच एक महत्वाचा पोर्शन म्हणजे  सेमीकंडक्टर चीप. ज्याच्याशिवाय लॅपटॉप, मोबाईल,  कार या इलेक्ट्रॉनिक वस्तू बनूच शकत नाही. तर या चीप तयार होतात  तैवानमध्ये. आता तैवान आणि चीनमध्ये आधीपासूनच तैवानला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्यावर भांडण सुरू आहे. ज्यामूळं ओढवलेल्या वादाची अनेक उदाहरण आहे. ते असो,

तर तैवानच्या तैवान सेमीकंडक्टर म्यॅन्यूफॅचरिंग कंपनी ( टीसीएमसी) मध्ये  मोबाईल फोन, लॅपटॉप, कम्प्युटरचे चिप्स म्हणजेच सेमीकंडक्टर डिव्हाइस बनवले जातात. आणि या चीपचे उत्पादन करणारी हि जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे.  संपूर्ण जग यासाठी तैवानवर अवलंबून आहे. पण आता अशा काही घटना समोर आल्यात की, ज्यानंतर तैवान वरची ती निर्भयता संपवायला हवी. नाहीतर मोठ्या जागतिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं बोललं जातंय.

तसं पहायचं झालं तर चीन आणि तैवानमध्ये खटके उडतच असतात.

मध्यंतरी असच काहीस घडलं, पण कोरोनामुळं त्याकडे जरा दुर्लक्ष झालं. तर सध्या या प्रकारचा ट्रिगर म्हणजे चीन आर्मीच्या काही हालचालींमुळे  तैवानला एकप्रकारे धमकी मिळतेय. मात्र त्यानंतर अचानक सगळ्या जगात तैवानच्या  चीप सप्लाय वरून संशय निर्माण झालाय.

कारण,  संपूर्ण जग ९० ते ९५ टक्के कम्प्युटर चीपसाठी किंवा हाय क्वालिटी सेमीकंडक्टर चीपसाठी तैवानवर डिपेंड आहे. तैवानची टीएसएमसी गेल्या अनेक वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवर जबरदस्त प्रभाव असलेल्या जगातील सर्वात महत्वाची सेमीकंडक्टर कंपनी म्हणून उदयास आली आहे. आणि ही  जगातील ११ वी सर्वात व्हॅल्यूवेबल कंपनी आहे, जिची मार्केटकॅप ५५० बिलियन   डॉलर इतकी आहे आणि ही अमेरिका लिस्टेड आहे. 

दरम्यान, गेल्या वर्षी  कोरोनाच्या पहिल्या लाटेत सगळ्या जगातली सप्लाय चेन विस्कळीत झाली होती. कारण आयात- निर्यात बंद झाली. याचा सगळ्यात जास्त फटका बसला होता अमेरिकेला. सप्लाय बंद असल्याने तिथल्या बऱ्याच कंपन्यांचे उत्पादन ठप्प झाले होत. कारण सेमीकंडक्टर चिपशिवाय आपण कार, मोबाईल, लॅपटॉप काहीच बनवू शकत नाही. यामुळे अर्धवट बनलेले सामना कंपन्यात तसेच पडून राहिले, तर अनेक उत्पादनच  बंद झाले, ज्यामुळे त्यांच्या किमती वाढल्या.

यानंतर अमेरिकेत निवडणुका झाल्या आणि जो बायडन सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी जो निर्णय घेतला तो म्हणजे सेमीकंडक्टर इंडस्ट्रीला सपोर्ट करणं, त्यांची मदत करणं. आणि आता अमेरिकन इंडस्ट्रीच्या रिव्हायव्हलसाठी  जो बायडन सरकारनं जो  नवीन इन्फ्रास्टक्चर प्लांट लॉन्च केलाय. त्यातही सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचा समावेश केलाय. त्यात ५० बिलियन डॉलरची मदत डोमेस्टिक चीप मॅनेजमेंटला देण्यात आलीये.  

आता केवळ तैवानवर अवलंबून असल्या कारणानं किंवा चीन आणि तैवान मधल्या भांडणांमुळं जगातल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना फटका बसलाय. चीपच सप्लायच बंद असल्यानं इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मर्यादा आल्या, जेवढा साठा शिल्लक होता, ती बाजारात आणला पण इथून पुढचं काय असा प्रश्न निर्माण झाला?

जगातले अमेरिका, चीन, जपान, कोरिया हे उत्पादक देश जे जगातील सगळ्यात जास्त इलेक्स्ट्रॉनिक सामान बनवतात. ते वेगाने  तैवानवरची आपली निर्भरता कमी करण्याचा प्रयत्नात आहे.  जेणेकरून आपल्या इथे सेमीकंडक्टर चीप बनवण्याची फॅसिलिटी उपलब्ध करता येईल.  

पण हे काम म्हणावं तितकं सोपं नाही, कारण हि फार हाय प्रोफाइल आणि हाय टेक्नॉलॉजी इंडस्ट्री आहे.  यात वेळ तर लागतोच तसा  पैसाही तितकाच लागतो.  आणि  खासकरून तैवानमध्ये जे ९२ % हाय क्वालिटी चीप बनतात, त्यांच्याबद्दल बोललं जात कि त्या केसांच्या एक हजाराव्या भागापेक्षा  जास्त लहान असतात. अश्या प्रकारच्या चिप बनवण्यासाठी जी फॅक्टरी असते किंवा टीसीएमसीला तोड देण्यासाठी तितका वेळ तर लागतोच.

दरम्यान, सेमीकंडक्टर हे  येणाऱ्या २-३ वर्षात एक महत्वाचं प्रोडक्ट बनणार आहे. कारण एकसाथ याच्या प्रोडक्शनसाठी तयारी सुरु आहे. आणि यात अमेरिका टॉपला आहे.  आपल्याच देशात चिप बनवून देशातल्या इलेक्ट्रॉनिक  कंपन्यांना पुरवायची आणि उत्पादनाला अडथळा दूर करायचा. हेच टार्गेट  आता इतर देशांनी ठेवलंय.  यात भारतही काही करतंय का हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणारे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.