साहित्यिकही किती दिलखुलास असू शकतो हे मिरासदारांकडे पाहून कळतं.
मी आत्मचरित्र लिहायला घेतलं आणि पहिली २५ ते ५० पाने लिहूनही काढली; पण तेवढ्यापुरतेच! माझ्यात आता पुढे लिहिण्याची ताकद नाही. तसंच लेखनिक ठेवून लिहून घेणारा मी लेखक नाही. त्याची मला सवयही नाही…..” ज्या कथाकार, लेखक साहित्यिकाने आपले अवघे आयुष्यच साहित्यासाठी वाहून घेतले त्या साहित्यकाला स्वतःबद्दल लिहियलाच सुचू नये..किती हा साधेपणा !
असो ज्यांना साहित्याची ओळख आहे त्यांना मिरासदारांची ओळख नसेल असे होणे शक्यच नाही.
बापाची पेंड हा १९५७ मधला त्यांच्या पहिल्याच कथासंग्रहाने ग्रामीण कथाकार म्हणून मिरासदारांना मान्यता मिळवून दिली. त्यानंतर त्यांच्या एकएक कथा आणि कथा संग्रह येत गेल्या आणि साहित्यात वरचेवर भर पडत गेला.
प्रा. द. मा. मिरासदार हे सर्वामध्ये ‘दादासाहेब’ म्हणून ओळखले जायचे.
ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. तसेच अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचे दिसून येते. तथापि त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती मिस्किल कथा लिहिण्याकडेच आहे.
प्रा. द. मा. मिरासदार हे सर्वामध्ये ‘दादासाहेब’ म्हणून ओळखले जातात. दादासाहेबांचा जन्म सोलापूर जिल्हय़ातील अकलूज या गावचा. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूरला झाले तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी खरं तर त्यांच्या करिअरची सुरुवात पत्रकार म्हणून केली होती. त्यांच्या सुरुवातीच्या काळात ते झंकार’ या साप्ताहिकात करायचे. त्यानंतर १९५२ मध्ये त्यांनी शिक्षक म्हणून पंढरपूर त्यानंतर पुण्यातल्या गरवारे कॉलेजला मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.
त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते कि,
त्यांचे बालपण पंढरपुरात गेले. त्यांचं कुटुंब श्रीमंत असलं तरी मिरासदार घराण्यातील साहित्य हा व्यवसाय म्हणून त्यांना परवानगी नव्हतीच. ते सांगतात कि,
“माझी आजी घरातली सगळी मुले जमवायची आणि आम्हाला कथा सांगायची आणि मी आवडीने बसायचो आणि तिच्या कहाण्या ऐकायचो, मी काल्पनिक कथांमुळे मोहित व्हायचो,मला आवड निर्माण झाली. मग मी जवळच्या पुस्तकांच्या दुकानातून किंवा त्यांच्याकडे असलेल्या मित्रांकडून पुस्तके उधार घ्यायचो आणि एकापाठोपाठ एक पान वाचून रात्रभरात संपवून टाकायचो. आमच्या घरात वीज नव्हती, म्हणून लहान रॉकेलचा दिवा माझा एकमेव तारणहार असायचा”.
पण जसे ते मराठी साहित्यात कथालेखक म्हणून आले आणि त्यांनी या क्षेत्रात मोठं योगदान देऊन गेले.
त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ग्रामीण साहित्याला भरभरून दिले आहे.
ग्रामीण जीवनावर त्यांनी लिहिलेल्या कथा विशेष गाजल्या. मराठी साहित्यात विनोदी साहित्याची परंपराच मोठी आहे. आणि याच परंपरेमध्ये त्यांचे विशेष असे योगदान आहे.
मिरासदारांन ग्रामीण जीवनाबद्दल ओढ होतीच तिचं ओढ त्यांनी त्यांच्या लिखाणात उतरवणारं असायचं. त्यातूनच त्यांनी ग्रामीण विनोदी कथांचे लेखन केले आहे. खेडेगावातल्या लोकांना देखील साहित्याचा आनंद मिळावा म्हणून त्यांनी आपल्या साहित्यातील मनोरंजनात गावातल्या माणसाचा आनंद शोधला.
चावडीवरच्या, पारावरच्या गप्पांचा फड हा खेडेगावातल्या माणसांना आनंद मिळवून देणारा असतो तसाच आनंद त्यांनी त्यांच्या लिखाणात ओतला. त्यांचं लिखाण म्हणजे शोधलेला सहज, सोपा मार्ग असतो. प्रत्यक्ष पाहिलेले, ऐकलेले काही प्रसंग, भेटलेली नमुनेदार माणसे यांना मिरासदारांच्या कथेत विशेष स्थान असायचे.
अतिशयोक्ती, उपहास, स्थानांतर, प्रसंगनिष्ठ विनोद, स्वभावनिष्ठ विनोद हे सर्व विनोदी लेखनाची वैशिष्ट्ये त्यांच्या कथांमध्ये आढळतात.
त्यांच्या कथेतला प्रसंग सहजगतीने उलगडत जातो. त्यात नाट्यमयता, दृश्यमयता, कथेला नवी कलाटणी देणारा प्रसंग, त्यातील अनपेक्षितपणा कथेच्या निवेदनातून जपलेला असतो. कथेचे निवेदन रंजक, वाचकाच्या मनातील कुतूहल जागे करणारे, अधूनमधून मार्मिक टिप्पणीची फोडणी असलेले मात्र आटोपशीरच असायचे.
‘सरमिसळ’, ‘गप्पांगण’, ‘बेंडबाजा’, ‘खडे-ओरखडे’ हे त्यांचे विनोदी लेखसंग्रह आहेत. याशिवाय मिरासदारांनी ‘सुट्टी आणि इतर एकांकिका’, ‘गाणारा मुलूख’ या कुमारांसाठी दोन नाटिका लिहिल्यात. ‘मी लाडाची मैना’ हे त्यांचे वगनाट्य तसेच ‘सोनियाचा दिवस’ ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. शिवाय मिरासदारांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी कथा-पटकथा-संवाद देखील लिहिले आहेत.
‘एक डाव भुताचा’ आणि ‘ठकास महाठक’ ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ‘व्यंकूची शिकवणी’ ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता.
साहित्यातली माणसे देखील इतकी दिलखुलास असू शकतात हे त्यांच्या एकंदरीत लिखाणाच्या अंदाजावरून कळायचं. त्यांचं अवाढव्य विनोदी लिखाण आणि कथासंग्रह आपल्यासाठी कायमच ठेवा असणार आहे.
हे हि वाच भिडू :
- बलात्कार झाल्यानंतर स्त्रियांची नाही तर त्या बलात्काऱ्याची अब्रू जाते
- महापालिकेच्या शाळेत शिपाई असणारे नारायण सुर्वे मराठी साहित्यातले कबीर झाले.
- खुद्द पु.ल.देशपांडे यांच्या हस्ताक्षरात साहित्यिक आनंद यादव यांचा जन्म झाला.