गोव्यातून एक बाटली आणली की मोक्का विषय इतक्यावर भागत नाही
गोव्यातून विनापरवाना दारुची एक बाटली जरी आणली तरी थेट मोक्का लावणार असा इशारा राज्याचे अबकारी खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलाय. साहजिक नुसती एक बाटली आणली तरी मोक्का. आजवर पुण्या-मुंबईच्या मोठमोठ्या डॉन मंडळींना मोक्का लागण्याच्या बातम्या येत होत्या. त्यामानाने गोव्या दारूची बाटली आणणं म्हणजे किरकोळच गोष्ट. असो तर खरच अस होणार आहे का? शंभूराज देसाई म्हणलेत ते खरय का? आणि गोव्यातून परवाना घेवून दारू आणता येते का?
सर्वात आधी जाणून घेऊया मोक्का कायदा नेमका काय आहे त्याबद्दल..
देशातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने ‘टाडा’ कायदा आणला होता. परंतु या कायद्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप देशभरातून होत होता. कोर्टाने सुद्धा यावर ताशेरे ओढले होते. त्यामुळे केंद्र सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागला. हे सगळं प्रकरण समजून घेण्यासाठी खालील दिलेली लिंक क्लीक करा.