550 वर्षांपूर्वीच्या ममीची भारतात देव समजून पूजा केली जाते…

भारतातील आस्था, पूजापाठ यांची ताकद खूप मोठी आहे. लोक भक्तिरसात डुंबून दाखवतात साधू संतांविषयी, देवाविषयी भक्ती प्रकट करतात. याच आस्थेमुळे मूर्तीची पूजा केली जाते. एक अशीच गोष्ट आहे भारतात असणाऱ्या एका देवाची जे खरंतर 550 वर्षांपूर्वीची ममी आहे पण त्याला देवाचा दर्जा दिलेला आहे.

लोक या ममीला जिवंत देव मानतात. आजही 550 वर्षे जुनी ममी भारत-तिबेट सीमेवरील हिमाचलमधील लाहौल-स्पिती येथील गयू गावात एक गूढच आहे. ही ममी पाहण्यासाठी परदेशातून लोक येथे पोहोचतात.

लाहौल स्पिती येथील ऐतिहासिक ताबो मठापासून सुमारे ५० किमी अंतरावर ये गयु नावाचे गाव वर्षातील ६-८ महिने बर्फाने झाकलेले असते. या कारणास्तव त्याचा बाह्य जगाशी विशेष संबंध नाही. ही ममी लामा सांगला तेनझिंग यांची आहे, ज्यांनी तिबेटहून गयू गावात येऊन तपश्चर्या केली होती, असा विश्वास आहे.

तपश्चर्या करताना तेनसिंगने प्राण त्याग केला असे लोक मानतात. त्यावेळी 45 वर्षीय तेनसिंग यांचा मृत्यू झाला तेव्हा ते बसलेल्या स्थितीत होते आणि आजही ही ममी तशीच आहे. ही ममी जगातील इतर ममींपेक्षा वेगळी आहे कारण ही जगातील एकमेव ममी आहे जी बसलेल्या स्थितीत आहे.

शास्त्रज्ञांनी या ममीचीही तपासणी केली ज्यामध्ये असे आढळून आले की तिचे वय 550 वर्षे आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ममी बनवण्यासाठी सामान्यतः मृत शरीरावर एक विशेष प्रकारचा लेप लावला जातो, परंतु या ममीला कोणत्याही प्रकारचा लेप नव्हता, असे असूनही ती इतकी वर्षे सुरक्षित आहे. या ममीचे अस्तित्व हेच एक मोठे रहस्य आहे जे आजपर्यंत कोणीही सोडवू शकलेले नाही.

इतकेच नाही तर स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या ममीचे केस आणि नखे आजही वाढत आहेत. या सर्व कारणांमुळे येथील लोकांनी या ममीला जिवंत देवाचा दर्जा दिला आहे आणि देवाची जशी पूजा केली जाते तशीच पूजा केली जाते.

शिवाय निसर्गाच्या कोपाचा सामना करूनही ही ममी सुरक्षित आहे. वास्तविक 1974 मध्ये येथे भूकंप झाला होता ज्यामध्ये ही ममी जमिनीत गाडली गेली होती. यानंतर 1995 मध्ये येथे रस्ता बांधणीचे काम सुरू झाल्यावर ते हटवण्यात आले. ITBP जवानांना रस्त्याच्या बांधकामासाठी जमीन खोदत असताना ही ममी पुन्हा सापडली.

विश्वास बसणार नाही, पण या ममीबद्दल असं म्हटलं जातं की, उत्खननादरम्यान कुदळ त्याच्या डोक्यावर आदळली तेव्हा त्याच्या डोक्यातून रक्तही बाहेर आलं. सामान्यत: कोणाच्या मृत शरीरातून रक्त येत नाही, परंतु या मम्मीच्या डोक्यातून रक्त येत होते जे एक असामान्य आणि अविश्वसनीय गोष्ट आहे. कुदळीनंतर ममीच्या डोक्यावर केलेली खूण आजही पाहायला मिळते.

आजसुद्धा अनेक श्रद्धाळू या ममीची पूजा करतात आणि भारतातल्या आश्चर्य वाटणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे ही 550 वर्षे जुन्या ममीची पूजा या भागात मोठं भूषण मानलं जातं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.