बांग्लादेशाची निर्मिती भारताच्या किलर्स स्क्वॉड्रनमुळे झाली.

बांग्लादेशच्या निर्मितीस निमित्त ठरलेल्या १९७१ च्या भारत-पाक युद्धाला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसून कराची बंदरावर चढवलेला हल्ला पाकिस्तानच्या वर्मीचा घाव ठरलाय. आज ही तो दुखऱ्या जखमेसारखा ठसठसतोच आहे.

पण हा वर्मीचा घाव देण्याचं काम केलं होतं भारताच्या किलर्स स्क्वॉड्रन या नौदलाच्या ताफ्याने…

पाकिस्तानी नौदलाच्या चार युद्धनौकांना थेट जलसमाधी देत २२ व्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकांच्या किलर्स स्क्वॉड्रन ताफ्याने आपल्या आगमनाची वर्दी केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिली होती.

अगदीच अनोख्या पध्दतीने केलेला नौदलाचा हल्ला या शब्दांत जगाच्या नौदल इतिहासात या हल्ल्याची नोंद झाली. त्यावेळी भारतीय युद्ध नौकांनी जे मिसाईल डागल होत तीच खरी युद्धाची रणनीती होती. आणि हे मिसाईल डागलं होत

श्री रामराव गंदीकोटा

तर भारतीय नौदलाची मारकक्षमता वाढविण्यासाठी १९७१ मध्येच मित्रराष्ट्र असलेल्या सोव्हिएत रशियाकडून ओसा वर्गातील युद्धनौकांचा समावेश भारतीय नौदलात करण्यात आला होता. अवजड व्यापारी नौकांच्या माध्यमातून या नौका भारतात आणून कोलकाता येथे १९७१ साली त्यांचा समावेश भारतीय नौदलात करण्यात आला.

पण त्याआधी म्हणजे १९७० च्या उन्हाळ्यात इंडियन नेव्हिने तरुण नौसैनिकांचा एक ग्रुप रशियाच्या टॉप सिक्रेट मिशनवर पाठवला होता. या ग्रुप मध्ये नेव्हीचे ४० ऑफिसर्स आणि १८ नॉन कमिश्नड कर्मचारी होते. हे सिक्रेट मिशन Vladivostok या रशियाच्या शहरात सुरू होत.

त्याकाळात युद्धनौकेतून क्षेपणास्त्र डागण हे नवीन युद्ध तंत्र अस्तित्वात येतं होत. आणि ओसा ही युद्धनौका त्याच कॅटेगरी मधली होती. त्यामुळेच हा ग्रुप तिकडे गेला होता. या इंडियन ग्रुपमध्ये मिसाईल ऑफिसर श्री रामराव गंदीकोटा सुद्धा होते. इंडियन ग्रुपने तिथे जवळपास आठ महिने ट्रेनींग घेतलं. या ट्रेनींगचा भाग म्हणून या ग्रुपने रशियन भाषा शिकून घेतली. आणि हा ग्रुप १९७१ एप्रिलच्या मध्यात भारतात परतला.

भारतीय नौदलातील सर्वात तरुण नौसैनिक आणि नौदल अधिकारी त्या वेळेस या ताफ्यामध्ये होते.

त्यानंतर बांग्लादेश युद्धाला सुरुवात झाली.

१९७१ च्या मध्यावधीत पाकिस्तानी आर्मीने पूर्व पाकिस्तानात भयंकर अत्याचार करायला सुरुवात केली. या अत्याचारात मोठ्या प्रमाणावर मास किलिंग सुरू होत. बरेच देश पाकिस्तानच्या बरोबर होते. हे मास किलिंग आणि अत्याचार थांबवणं फक्त आणि फक्त भारताच्याच हातात होत.

आणि मग युद्ध सुरू झालं.

३ डिसेंबर रोजी पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसून अमृतसर, पठाणकोठ, श्रीनगर, अवंतीपूर, अमृतसर, जोधपूर, अंबाला, आग्रा, उत्तरलाय इथं हल्ला चढवला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्या दिवशी राष्ट्राला उद्देश केलेल्या नभोवाणीवरील भाषणात हे भारताविरुद्ध पुकारलेले युद्ध असल्याचे सांगून भारत कडवे उत्तर देईल, असे जाहीर केले. आणि सैन्यदलांना तसे आदेशही दिले.

तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या मिटिंग पंतप्रधान इंदिरा गांधींनी बोलवल्या. यात नौदलाचे प्रमुख एचएम नंदा यांनी इंदिरा गांधींना काराचीवर अटॅक करण्याची परवानगी मागितली. तशी परवानगी ही इंदिरा गांधींनी लगेच दिली, कारण ओसाची याआधीची कामगिरी त्यांनी पाहिलीच होती.

या ओसावर (म्हणजे भारतात आल्यावर त्या युद्धनौकेच नाव आयएनएस निर्घात आणि निर्भीक असं करण्यात आलं होतं) श्री रामराव गंदीकोटा होते.

ऑपरेशन ट्रायडेंट असं या मोहिमेचे नामकरण करण्यात आलं. हा नौदलाचा ताफा ४ आणि ५ डिसेंबरच्या मध्यरात्री पाकिस्तानी सागरी हद्दीत कराचीनजीक पोहोचला. कराचीपासून २५ मैल अंतरावर असतानाच आयएनएस निर्भीकने पहिलं क्षेपणास्त्र डागलं आणि पीएनएस खैबर या विनाशिकेचा यशस्वी वेध घेत तिला जलसमाधी दिली. हे क्षेपणास्त्र डागलं होतं श्री रामराव गंदीकोटा यांनी.

दुसरा हल्ला आयएनएस वीरने चढवला आणि पाणसुरुंगशोधक पाकिस्तानी नौकेला सागरतळाशी धाडले तर आयएनएस नि:पातने पाकिस्तानी नौदलाच्या इंधननौकेला आगीच्या भक्ष्यस्थानी देत तिलाही जलसमाधी दिली.

एवढय़ावरच न थांबता ८ व ९ डिसेंबरच्या मध्यरात्री हल्ल्याचे दुसरे पर्व सुरू झाले. त्यात आयएनएस विनाश या युद्धनौकेने पाकिस्तानी नौदलाच्या ढाक्का या इंधननौकेला जलसमाधी आणि कराचीचे केयमारी तेलसाठे उद्ध्वस्त केले. ती आग चार दिवस धुमसत होती. या हल्ल्याने पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे पूर्णपणे मोडण्याचे काम केले.

भारताच्या या सर्वात तरुण किलर्स स्क्वॉड्रनचे वैशिष्टय़ म्हणजे कराची बंदरात घुसून करावयाच्या हल्ल्यादरम्यान सांकेतिक भाषा म्हणून या संपूर्ण ताफ्याने रशियन भाषेचा वापर करण्याचा निर्णय घेतला व तो अमलातही आणला. संपूर्ण हल्ल्यादरम्यान सर्व संवाद व आदेश रशियन भाषेतून देण्यात आले, त्यामुळे ते शत्रूला समजेपर्यंत कामगिरी फत्ते झालेले होती.

भारतीय नौदलाच्या या शौर्याचे प्रतीक म्हणून भारतीय नौदलातील या ताफ्याला ‘किलर्स स्क्वॉड्रन’ हे बिरुद मिळाले.

यंदा या शौर्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत तर भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे. याचे औचित्य साधूनच भारत-पाक युद्धामध्ये असीम शौर्य गाजविणाऱ्या आणि शत्रूला कंठस्नान घालणाऱ्या या नौदल ताफ्यास आज रोजी ८ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींचे मानांकन देऊन सेनादलांचे सर्वोच्च सेनापती असलेल्या राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद या सोहळ्यासाठी खास मुंबईत नौदल गोदीत येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल आणि माजी नौदल अधिकारी या सोहळ्यास खास उपस्थित राहणार आहेत.

विद्यमान स्थितीत नौदलाच्या पश्चिम तळाच्या ताफ्यात असलेल्या या स्क्वॉड्रनवर भारताच्या सागरी संपत्तीच्या रक्षणाची महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी आहे. शिवाय पश्चिम नौदल तळाच्या हद्दीत येणाऱ्या देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या संरक्षणाचीही जबाबदारी आहे. या ताफ्याचे सुरक्षाचक्र सध्या मुंबईला लाभले असून त्यामुळेच मुंबईला सुरक्षा लाभली आहे.

महत्त्वाचे म्हणजे किलर्स स्क्वॉड्रनचे मुंबईशी अनोखे नाते आहे, त्यांचे मुख्यालय अग्निबाहू मुंबईच्या नौदल गोदीमध्येच आहे. म्हणूनच राष्ट्रपती या सन्मानासाठी मुंबईत येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.