महात्मा फुलेंच्या प्रेरणेतूनच सयाजीरावांनी बडोद्यात मोफत प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली
महात्मा फुलेंना 63 वर्षांचं आयुष्य लाभले सयाजीराव गायकवाड यांना 75 वर्षांचे आयुष्य मिळाले सयाजीराव बडोद्याच्या गादीवर 1875 मध्ये म्हणजे वयाच्या 12 वर्षी विराजमान झाले आणि 1981 मध्ये बडोदा संस्थानाच्या राज्यकारभार पाहू लागले तेव्हा त्यांचा महात्मा फुले यांच्याशी संबंध आला आणि महात्मा फुले यांच्या मृत्यू पर्यंत म्हणजे साधारणतः दहा वर्षे कायम राहिला या दोघांच्या वयात ते तीस वर्षांचे अंतर होते आणि महात्मा फुले यांचे निधन झाले तेव्हा सयाजीराव महाराज फक्त 27 वर्षे होते.
सयाजी महाराजांनी बडोदा संस्थानात राज्यकारभार हाती घेतल्यापासून लगेचच समाजसुधारणा करण्याचा विडा उचलला, त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक समाजधुरीनांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. सयाजीराव महाराज सुद्धा महाराष्ट्रात समाजसुधारणेच्या अंगाने घडणाऱ्या प्रत्येक बाबीकडे लक्ष ठेवून होते.
याच दरम्यान शिवाजी महाराजांचे नायब सुभेदार असणाऱ्या धामणस्कर यांनी महात्मा फुले बद्दल महाराजांना सांगितले, महाराजांनी महात्मा फुल्यांना बडोद्यास बोलून घेतले दोन समविचारी व्यक्ती एकत्र आल्यावर त्यांची मैत्री पक्की होणार, या न्यायाने काही काळातच महाराजा सयाजीराव आणि महात्मा फुले यांची घनिष्ठ मैत्री झाली
महात्मा फुले बडोद्यात वारंवार जात होते महाराज त्यांची व्याख्याने राजवट आयोजित करत. असं म्हणतात की, ज्योतिबा फुले सयाजीरावांच्या इथे 10-12 दिवस मुक्काम करत. ज्योतिराव फुले आल्यावर त्यांनी सयाजीराव महाराजांना ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथाचे हस्तलिखित वाचून दाखवले महाराजांनी हा ग्रंथ वेळात वेळ काढून पूर्ण ऐकला, त्याचे प्रकाशन होण्यासाठी मदत केली.
सयाजीराव महाराज यांना पुणे शहराविषयी कायमच आकर्षण वाटत होते. सयाजीराव सुद्धा पुण्यात आल्यावर महात्मा फुले यांची आठवण काढत त्यांची भेट घेण्यासाठी घोडा गाडी पाठवात, त्यांना बोलावून घेत.
महाराजांनी बडोद्यातील लोकांना शिक्षणाने स्वप्न करण्यासाठी शिक्षण देण्यावर भर दिला बऱ्याच वेळा महाराजांनी याविषयी महात्मा फुले बरोबर चर्चादेखील केली. एवढेच नाही महाराज महात्मा फुले बरोबर समाजसुधारणेच्या चर्चा करत त्यामुळे त्यांना आणखीन प्रेरणा मिळायची सयाजीराव महाराज आणि महात्मा फुले यांचे संबंध अधिक दृढ झाले.
महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊनच सयाजीराव महाराजांनी बडोद्यात आदिवासीच्या सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली, आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. महाराज फुलेंना देखील वेळोवेळी आर्थिक मदत करत होते सत्यशोधक समाजातर्फे काढण्यात आलेल्या शाळेला महाराजांनी मोठी मदत केली होती.
सयाजीराव आणि महात्मा फुले यांचे संबंध काही काळातच वेगळ्या पातळीवर प्रस्थापित झाले सयाजीराव महाराजांच्या मनात महात्मा फुले यांच्याविषयी कायमचं आदर असल्यामुळे सत्यशोधक समाजाने त्यांचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्यांनाही महाराज यांनी मदत केली. महात्मा फुले यांचे समाज उद्धाराचे कार्य महाराजांना माहीत असल्यामुळे त्यांना महात्मा ही पदवी देण्यात त्यांचा वाटा होता. त्याप्रमाणे महात्मा फुले नाही त्याच्याबद्दल खुप आदर होता.
महाराष्ट्रात कडव्या परंपरावादी लोकांचा विरोध होता तर बडोद्यात वेगळ्या भाषेत रुपयामध्ये सुधारणा करावयाच्या होत्या, दोन्हींकडे समाज रचना भिन्न होत्या परंतु सयाजीराव आणि फुलेंच्या कामाचे ध्येय मात्र होते ते म्हणजे मानवाचे कल्याण.
महात्मा फुलेंनी महाराज्यांच्या आधी महाराष्ट्रात समाज परिवर्तनाचे अजोड कार्य केले त्यांचा वारसा महाराज सयाजीराव गायकवाड यांनी गुजरात प्रांत चालवला. समाजातील दुःख दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, असे म्हणता येईल महात्मा फुलेंनी समाज सुधारणेचा पाया घातला आणि त्यावर सयाजी महाराजांनी सोनेरी कळस चढवला.
हे ही वाच भिडू :
- सयाजी महाराजांचा गायकवाड वाडा केसरी वाडा कसा झाला?
- तुम्हाला माहित आहे का, सयाजीराव महाराजांच्या पत्नी जागतिक किर्तीच्या लेखिका होत्या
- महात्मा फुले सिनेमात गाडगेबाबांनी रोल केलेला तर मुहूर्त आंबेडकरांच्या हस्ते झाला होता