राजा रवी वर्मांमुळे महाराष्ट्रात नऊवारी साडीचा ट्रेन्ड सुरू झाला
राजा रविवर्मा म्हणजे महाराष्ट्राला केरळने दिलेलं अनमोल रत्नय. महाराष्ट्रातलं एकही पेंटिंग म्यूजियम त्याच्या चित्रांशिवाय पूर्ण होत नाही. श्रीमंत लोकांच्या घरात त्याची चित्र किंवा त्याच्या कॉप्या हमखास टांगलेल्या आढळतात. त्याची चित्रांवरची पकड एवढी जबरदस्त होती की त्याला ब्रिटिश सरकारने कैसर-ए-हिंद पुरस्काराने गौरवलं होतं.
पण हा माणूस एक ट्रेंड सेटरसुद्धा होता. भारताच्या गव्हर्नर-जनरलने त्याला राजा टायटल वापरायला परवानगी दिली होती.
राजा रविवर्मा त्रावणकोरच्या श्रीमंत घराण्यातून आला होता त्यामुळं त्याच्यावर खास केरळच्या उच्चवर्णीय संस्कारांचा भर होता. त्याच्यावर युरोपच्या तत्कालीन चित्रकला आणि कलेत घडणाऱ्या बदलांचा प्रचंड प्रभाव पडला. त्यामुळं वास्तविक जीवनाच्या जवळ जातील अशी चित्रे रेखाटण्याची त्याची हातोटी वादातीत होती.
त्यात भारतीय पद्धतीच्या अविष्काराचा अवलंब तो करत असे. त्यामुळं श्रीमंत घराण्यातील तसेच राज बायकापुरुष आपली चित्रे त्याच्याकडून काढून घेत असत.
प्रसिद्ध मराठी संशोधक रामचंद्र तुकाराम पाटील ह्यांनी १९ व्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या आरंभाकडे महाराष्ट्र नेमका कसा होता ह्यावर लेखन केलं आहे .
त्यात ते तत्कालीन समाजातील स्त्री-पुरुषांच्या वेषाचाही उल्लेख करतात.
“तेव्हा महाराष्ट्रातील ९०% स्त्रिया या वस्त्र असत. आर्थिक वेगवेगळे प्रकार असत. जातीनुसारही त्याचा पेहराव करण्याची वेगळी पद्धती असे. पातळ हे वस्त्रच त्या काली अस्तित्वात नव्हते, निदान खेड्यापाड्यापर्यंत तरी ते पोचलेले नव्हते.
नऊवारी शालू अति श्रीमंत जमीनदार, सावकार, इनामदार यांच्या स्त्रियांच्या अंगावर तोही विशेष प्रसंगी वापरण्यात येणारा प्रकार होता.
चोळीही त्या काळात बायका घरातल्या घरात फाडून दोऱ्याने जोडून शिवून तयार करत. म्हाताऱ्या बायका चोळी कशी बेतायची, कशी शिवायची ते तरुण स्त्रियांना शिकवीत. “
असे त्यांनी आपल्या संशोधनात लिहिलं आहे.
हाच राजा रविवर्मा याची चित्रकला बहरात येण्याचा काळ होता. भारतात तेव्हा अनेक चित्रकार होऊन गेले होते मात्र जनसामान्यांवर एवढी मजबूत पकड असणारा चित्रकार कुणीही नव्हता. पौराणिक चित्रांची निर्मिती करण्यात त्याचा हातखंडा होता. स्थानिक कलांना आणि पद्धतींना आपल्या चित्रात यशवीपणे वापरण्यासाठी तो प्रसिद्ध होता.
जे. स्वामिनाथन यांनी त्याच्यावर केलेल्या संशोधनानुसार त्यांनी आपल्या चित्रकलेत दाखवलेल्या स्त्रियांच्या कृष्णवर्णाविषयी हेच मत मांडले आहे की ते ज्या भागातून येतात तिकडे लोक रंगाने सावळे असत आणि त्यांची आई स्वतः सावळी होती, उत्तम कवयित्री होती.
त्यांची स्वतःची बायको आणि राजघराण्यातल्या बहिनी ह्याही सावळ्या होत्या. त्यांच्या मोठ्या मुलीनेही त्याच्या चित्रांसाठी मॉडेल म्हणून काम केले तेव्हा त्यांचे पाहिलेलेच गुणविशेष त्यांनी जसेच्या तसे उतरवले. म्हणून त्यांच्या चित्रांमध्ये सावळ्या स्त्रियांचे दर्शन घडते.
अशातच ते महाराष्ट्रात आल्याने त्यांनी येथील पद्धतीनं चित्रे रेखाटायला सुरुवात केली.
त्याकाळात फक्त मोठ्या घराण्यातच नौवारीची पद्धती होती. तेव्हा इथे आल्यावर त्याला मिळणाऱ्या कामानुसार त्याने ही चित्रे रंगवायला सुरुवात केली. ह्याच सुमारास त्याने रेखाटलेले बडोदा व इतर संस्थानातील राण्यांचे चित्र प्रसिद्धीस पावले होते.
ह्यात महाराणी चिमणाबाई नऊवारी आणि सोबत लांब बाह्यांचे जॅकेट घालून असणारे तैलचित्र भारतात आणि बाहेरही प्रसिद्धीस पावले. “Indian Women Attire” म्हणून ह्याला देशपरदेशात मान्यता मिळाली.
आता हि चित्रे प्रचंड महागडी होती आणि ती सर्वसामान्यांपर्यंत पोचणे शक्यच नव्हते. त्यावेळी राजा रविवर्मा यांनी आपली स्वतःची प्रेस सुरु करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यांची हि प्रेस त्या काळातील भारतातील सर्वात मोठी आणि सगळ्यात जास्त नवनवे प्रयोग करणारी प्रेस होती. त्यामुळं आता राजा रविवर्मा यांच्या चित्राचा प्रसार होणार होता.
पण सर्वजण विकत घेतील अशी चित्रे कोणती असू शकतील? उत्तर होते, अर्थातच देवदेवतांची चित्रे..!
हळूहळू आपल्या पौराणिक चित्रांकडे जातानाही त्याला मुख्यतः तत्कालीन पुराणात स्त्रियांचे कपडे कसे असावेत ह्याचा विचार करावा लागत होता. ह्याआधी त्यांनी केरळ पद्धतीची साडी घालणारी स्त्री साकारली होती मात्र आता त्याला सगळ्या भारतभर देवी म्हणून सामान्यजनांना स्वीकारहार्य होईल अशी वेशभूषा हवी होती.
त्यातच त्याच्या राजघराण्यातील उंची नऊवारी घालणाऱ्या बायकांच्या चित्रांचा जयजयकार होत होता. तेव्हा त्यांनी पुराणकालीन सीता, द्रौपदी, पार्वती ह्यांनाही त्यानं नऊवारीतच दाखवायचं ठरवलं.
त्यांनी महाराष्ट्रात उपलब्ध असणाऱ्या मॉडेलकडून सरळसरळ नऊवारीत पोज घेतल्या आणि चित्रे काढली. ह्यात महाभारतातील दमयंती काष्ठा घातलेली नऊवारी घालून हंसाजवळ उभी असताना, अज्ञातवासातली द्रौपदी अर्थात सैरंध्री हलक्या कापडाची नऊवारी तर आणि राणी सिंहका रेशमी साडी घालून असताना किंवा थेट सरस्वती आणि लक्ष्मी अशा देवताच आपापली आयुधे घेऊन असताना मात्र नऊवारी बसलेल्या त्यांनी दाखवल्या.
त्यांनी आपल्या प्रेसमधून हि चित्रे छापायला सुरुवात केली.
लिथोग्राफीचे तंत्र भारतात जास्त प्रचलित नव्हते, त्यामुळं देवळात दिसणाऱ्या देवीदेवता आपल्या घरातही असाव्यात म्हणून ह्या चित्रांना प्रचंड मागणी आली. ह्यातल्या देवी ह्या कुणीतरी उच्चकुलीन नव्हत्या.
त्यांच्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात आपुलकी झाली.
आणि हीच गोष्ट घडली त्यांच्या कपड्यांबाबत. त्यांनी केलेली वेशभूषा सुद्धा सामान्य माणसाला जवळची वाटेल अशीच होती. त्यामुळं ही कपडे फक्त उच्चकुलीन स्त्रियांसाठीच असतात हा समज मोडीत निघाला आणि सर्वसामान्यांमध्ये त्याच पद्धतीने साडी नेसण्याची आणि वापरण्याची पद्धत रूढ झाली.
ही चित्रे एवढी प्रसिद्ध होती कि रविवर्मा तोट्यात गेल्यानंतर हि प्रेस विकत घेणाऱ्या फ्रित्झ शिंडलर ह्या जर्मन माणसानेही हीच चित्रे वापरून इतर देवीदेवतांनाही नऊवारी साडीत बनवलं आणि ही चित्रे प्रसिद्धीस पावली.
आजही आपण हीच चित्रं आपल्या घरांत आणि देवळांत पाहतो. अर्थात देवीदेवतांचा अपमान केला म्हणून तेव्हा रविवर्मा ह्याच्यावर काही लोकांनी आरोपही केले होते. मात्र त्याच्या प्रसिद्धीमुळं त्याच्या कलेवर कोणत्याही मर्यादा आल्या नाहीत.
इतिहास अनेक गोष्टी उलगडून दाखवतो. पण या घडामोडींतला सर्वात महत्वाचा पदर होता तो म्हणजे राजा रवी वर्मा यांच्यामुळे महाराष्ट्रात नऊवारी घालण्याचा ट्रेन्ड सर्वसामान्य स्त्रीयांमध्ये रुजला.
हे ही वाच भिडू
- ठराविक जातींसाठी असणाऱ्या देवांना त्यांनी चित्रांमधून सामान्यांच्या घरात पोहचवलं
- पैशांच्या श्रीमंतीत जगात आठ नंबर तर मनाच्या श्रीमंतीत जगात एक नंबरला असणारा राजा.
- या साडीच्या डिझायनची नक्कल केली तर जेलमध्ये जायला लागेल !
भिडू, राजा रवी वर्मा हे त्रावणकोर घराण्याचे नव्हते,तर त्यांचे मांडलिक होते आणि कलाकार म्हणून तेथे त्यांची कदर होती आणि “राजा” ही पदवी त्रावणकोरच्या राजानेच त्यांना दिली.
Old is always gold