रोजच्या वापरातील मसाल्यांचा औषधी उपयोग
घरगुती मसाल्यांचा उपयोग अनेक कारणांसाठी होतो. जसे ते भाजीला जव आणण्यात मदत करतात तसेच ते औषध उपचारासाठी देखील उपयुक्त ठरतात. असेच औषधी उपयोग असणाऱ्या काही मसाल्याचे महत्व जाणून घ्या.
ओवा (Carom Seeds)
पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे. रोज रात्री झोपताना चिमुटभर ओवा खालल्यास पोट दुखी, पोट फुगणे, अजीर्ण होणे इत्यादी होणार नाही. ‘ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल’, ही म्हण प्रचारात आहे. ओव्याने शौचास साफ होते ओव्याने पोटातील कृमी निघून जाते. जेवण नंतर सम प्रमाणात ओवा, बदामाची बी व सुके खोबरे खालल्यास उरतील जळजळ होत नाही. दुध पचत नसल्यास ओवा खावा. दुध पचते Bedwetting (झोपेत लाघवी) करणाऱ्या लहान मुलांना रोज रात्री अर्धा गरम ओवा खायला दिल्यास फरक पडतो. अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो
आले (Ginger)
थंडी पासून डोके जड झाले असेल तर आल्याचा रस डोक्यावर चोळावा, डोके दुखायचे राहते. आल्याचा रस मीठ घालून चोळल्यास सांधे दुखी थांबते कानास ठणका लागला असता कोमात आल्याचा रस घलव. ठणका राहतो. रोजच्या भोजनात आले हे आवश्यक आहे. आले भूक वाढविते. जेवणास बसण्यापूर्वी आले खालल्यास तोंडाची रुची वाढून भूक वाढते. आल्याच्या रसानी श्वास लागत असल्यास, छातीत दुखत असल्यास आराम मिळतो. आले व लिंबाचा रस पोटात वायू झाला असल्यास किंवा ताण आल्यास गुणकारी आहे. आले व मधाचे चाटण खोकल्या पासून आराम देते उलटी होत असल्यास आल्याचा रस व थोडी खाडी साखर घेतल्यावर उलटी थांबते.
जायफळ आणि जायपत्री (जावंत्री) (Nutmeg and Mace)
जायफळ आणि जायपत्री एकाच झाडाची फळे आणि पाने अहेत. जायपत्री उष्ण अस्ते. चोरट्या तापावर, कफ, खोकला असला तर जायपत्री विद्याच्या पानाबरोबर देतात. जायपत्री पाण्यात उगाळून डोक्यास लावल्यास डोके दुखी थांबते. भूक न लागणे, खाणे पचत नसणे, भूक मंद होणे, जायपत्री ह्यावर उत्तम उपाय आहे. जायपत्री व खोबरेल तेल केसाला लावले तर केस गळणे थांबते व केस वाढतात. सांधे दुखत असल्यास जायपत्रीचे तेल लावल्याने दुख ताबडतोब बरे होते
जिरे / शहाजिरे
भूक लागत नसल्यास ओकारी येत असल्यास, जिरे द्यावे जिरे आणि वावडिंगाची पूड गुळाबरोबर दिल्यास लहान मुलांचे जंत मरतात. पोट फुगले तर जिरे खावे. सुन्ठीची व जीऱ्याची पूड मधातून घेतल्यास खोकला थांबतो. जीऱ्याची पूड साखरे बरोबर दिल्यास जुलाब (आव) थांबतात. आंबट ढेकर व पित्त पडत असल्यास सुद्धा हे उपयोगी आहे
तीळ
तीळामुळे भूक वाढते व शक्ती येते. मुळव्याधीवर तीळ रोज खालल्यास परसाकड साफ होवून बरी होते. तीळ वाटून गरम करून शेकल्यास सूज कमी होते. तीळ आणि ओवा समप्रमाणात दोन वेळा घेतल्यास वारंवार लघवीस जाण्याचे प्रमाण कमी होते. तिळाच्या पोतीसाने शेकल्यास वायुमुळे आलेली चमक निघून जाते. तिळाचे तेल केसास लावल्याने केस चांगले राहतात व वाढतात
दालचिनी
पोट फुगत असेल, वायू सरत नसेल, भूक बिलकुल लागत नसेल तर दालचिनी, सुंठ व वेलदोडे ह्यांचे (समभाग) चूर्ण जेवणापूर्वी मधा बरोबर घ्यावे. दालचिनीच्या गोळ्या सुका खोकला सुटण्यासाठी देतात. जीर्णज्वर, अग्निमांघ व साधारण कडकीवर सितोपलादी चूर्ण देतात त्यामध्ये दालचिनी असते. दालचिनी परसाकड थांबवणारी आहे.
धने
धने लघवीस साफ करणारे आहेत.रुची वाढून भूक लागते. धने आणि साखर खाल्यास पित्त बसते. धने पाचक आहेत.धने कृमिनाशक आहेत. नुसते धने किंवा मधाबरोबर पूड घेतल्यास जंत कमी होतात. धने आणि जेष्ठमध यांचा काढा खोकल्यावर उत्तम औषध आहे. धने दृदयाला अत्यंत उपकारक आहेत. साखरेबरोबर धने घेतल्यास बेचैनी जाऊन आराम पडतो.
सुके खोबरे
शौचास फार होत असल्यास सुके खोबरयाचा तुकडा खाल्यास शौचास जावेसे वाटणार नाही. सुके खोबरे वीर्यवर्धक आहे. लसूण खोबरयाची चटणीने वात जातो.
बडीशेप
कोमट पाण्याबरोबर बडीशेप खाल्ल्यास वायुने फुगलेले पोट उतरते. बडीशेप बुद्धी वाढवणारी आहे. बडीशेपचे चूर्ण व मध सेवन केल्यास बुद्धी तरतरीत होते. अन्न पचविण्यास बडीशेप उपयुक्त आहे. पोटदुखी कमी करते. बडीशेपचा काढा साखर घालून दिल्यास ओकारी व अंगाचा दाह थांबतो. थोडया तुपात बडीशेप तळून, वाटून ते चूर्ण मस्तकावर बांधल्यास मस्तक दुखी थांबते.
मिरची
ओली कोथिंबीर व हिरव्या मिरचीची चटणी तोंडास रुची आणते. लाल मिरच्यांची बारीक पूड व दुप्पट गुळ घालून केलेल्या गोळ्या खाल्ल्यास पोटदुखी थांबते. आमांश, हगवण, कोलरा, हयात मिरचीच्या गोळ्या. कांद्याच्या रसात सम प्रमाणात मिरची व चुन्याच्या मिश्रणाची गोळी करतात. मिरचीचे तिखट दारू पिणारया माणसाना भूक लागत नसेल तेव्हा दारू सोडून खाल्यास भूक चांगली लागते.
मिरे
भूक वाढविणारया सर्व औषधात मिरे उत्तम.मिरे पोटातील वात कमी करणारे आहे. मिरे कफ कमी करणारे आहे. चिमुटभर मिरयाचे चूर्ण पंचपात्रीभर कढत पाण्याबरोबर घ्यावे खोकला थांबतो. धाप लागली असल्यास चिमटीभर मिरयाचेचूर्ण,४ थेंब मध व चिंचोकाभर तुपाशी वरचेवर घेतले असता श्वास बसतो. मिरपूड आल्याच्या रसात घेतल्यास अन्न पचते. मिरे पोटशूळ थांबवते. ४ मिरयाचे दाणे सकाळ, संध्याकाळ चावून खालल्यास कृमी नाहीशी होते. कसल्याही हिवतापावर मिरयाचा काढा वस्ताद आहे. दात दुखत असल्यास मिरयाच्या पाण्याने वारंवार गुळण्या केल्यास दुखणे थांबते.
मीठ
रुची आणणारया पदार्थात मीठ श्रेष्ठ आहे. मीठ कफघ्न आहे. मीठाच्या पाण्याने कफ पातळ होऊन भराभर सुटतो व त्रास कमी होतो. थोडे आले भाजून त्याला मीठ लावून खालल्यास पोट साफ होते. सुंठ भाजून मीठ लावून खाल्ली असता वायू सरून ढेकर बंद होतात व पोट साफ उतरते. मीठामुळे शौचास व लघवीस साफ होते. कफाने भरलेली छाती मीठाने शेकली असता हलकी होते. मीठ गुणकारी असले तरी जास्त खाण्याचा पदार्थ नव्हे हे लक्षात असू द्या. अपाय होण्याचा संभव असतो.
मेथ्या
भूक वाढते, पोटात वायू होऊ देत नाही. मेथ्या कफघ्न आहे. सर्व अंग दुखत असल्यास, सांध्याला कळा लागल्या असल्यास. वातांना हैराण झाले असल्यास मेथ्यांचे लाडू करून खवे. कळा थांबतात वात बरा होतो. मेथ्यांचे लाडू वातावर व शक्तीसाठी उत्तम घरगुती औषध आहे
मोहरी
कफाच्या तापावर मोहरीची पूड मधातून घेतल्यास ताप कमी होतो. उचकी थांबविण्यास मोहरीची पूड, मध व तुपाचे चाटण द्यावे. मोहरी पूड, साखर, तुपात चार दिवस घेतल्यास भूक वाढत पोटदुखी थांबवते. मोहरी कफ़घ्न आहे. खोकल्यावर व कफावर मोहरी सारखे दुसरे उत्तम औषध नाही मोहरी कृमिघ्न आहे.
लवंग
कफ नाहीशी करणाऱ्या औषधांमध्ये लवंग अग्रस्थानी आहे. खोकल्यावर, ढास लागली असेल तर लवंग चावून खालल्यास ठसका थांबतो, खोकला सुटतो. भूक लागण्यास लवंगा उत्तम लवंगाचे पाणी पिल्याने तहान कमी होते. ओकारीची भावना लवंगेने नाहीशी होते. दात दुखत असल्यास दातात लवंग धरली असता दुखणे थांबते
वेलदोडा
वेलदोडा अत्यंत पाचक आहे. अन्न पचविण्यास अपचनामुळे करपट ढेकारांवर वेलदोडा उत्तम उपाय आहे. वेलदोडा कफघ्न आहे. वेलदोडयाचे व सुंठीचे वस्त्रगाळ चूर्ण मधातून चाटावयास दिल्यास कफ पडण्याचे थांबून खोकला कमी पडतो. पोटफुगीवर वेलदोड्या सारखे जालीम औषध नाही. वेलदोडा रुची उत्पन्न करणारा आहे
हळद
हळदीचा उपयोग पोटातून व वरून रक्तशुद्धीसाठी करतात हळद, गुळाच्या लहान गोळ्या, वाव्दिन्गाच्या काढ्या बरोबर पिण्यास दिल्यावर जंत कमी होतात समप्रमाणात हळद आणि तीळ व दुप्पट गुल घालून दुवक़्त दोन घोट कोमट पाण्याबरोबर घेतल्यास कसल्याही प्रकारची जास्त झालेली लघवी थांबते. सर्दी पडसे झाले असता हळद दुध घेतल्यास आराम पडतो. हळकुंडाचा जाड लेप पडल्यावर, लागल्यावर लावण्याची प्रथा आहे. हळद जंतुघ्न (disinfectant) आहे
हे ही वाचा भिडू.
- चिकन 65 मधला 65 हा आकडा नेमका कोणी लावला..?
- जगातलं सगळ्यात महाग मटण घेताय काय ? साडेतीन लाखात व्यवहार करु..!
- जगातलं सगळ्यात महाग मटण घेताय काय ? साडेतीन लाखात व्यवहार करु..!