नेपाळमध्ये मासिक पाळी दरम्यान वाळीत टाकणे कायदेशीर गुन्हा झालाय,परंतु बदल घडेल का ?
पश्चिम नेपाळमधील १० पैकी ८ मुली मासिक पाळीच्या त्या ४-५ दिवसांच्या काळात घराच्या मागे एका धोकादायक झोपड्यांमध्ये राहतात. कारण काय तर ती मासिक पाळीत अपवित्र असते, आणि अशा स्त्रिया/मुली घरात राहू नयेत म्हणून तिला हातपाय पसरता येतील अशा लहानश्या झोपडीत राहावे लागते. तिथे ही प्रथाच होती. पण अगदी अलीकडेच निषिद्ध झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी नेपाळमध्ये पहिली अटक झाली त्याला कारण होतं मासिक पाळीच्या वेळी घरातल्या मुलीला घराच्या मागे एका झोपडीत ५ दिवस राहायला लागलं म्हणून…
आणि त्यामुळे परिणाम व्हायचा तोच झाला.
या अमानुष प्रथेने काठमांडू मधील एका २१ वर्षीय तरुणीचा बळी घेतला होतं. ३१ जानेवारी २०१९ रोजी दोती जिल्ह्यात पार्वती बोगती ही तरुणी मासिक पाळीमुळे ‘त्या’ झोपडीत एकटी राहात होती. या झोपडीत कुठूनही हवा येत नव्हती. खिडकीशिवाय असलेल्या झोपडीत राहिल्याने या तरुणीचा गुदमरून मृत्यू झाला होता.
पण आता नेपाळ मध्ये आता मासिक पाळी दरम्यान वाळीत टाकणे कायदेशीर गुन्हा झालाय.
“छौपदी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या असल्या बेकायदेशीर प्रथा शतकानुशतके चालत आल्या आहेत. पण आता याच प्रथा कायद्याने गुन्हा ठरल्यात त्यामुळे नेपाळ ,मध्ये झालेल्या या निर्णयाचे नक्कीच स्वागत झाले पाहिजे.
२००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अशा रुढींवर बंदी घातली, २०१७ मध्ये या कृतीस गुन्हा ठरवले आहे आणि २०१९ मध्ये पहिल्यांदा या कायद्याची अंमलबजावणी केली गेली.
आणि सगळ्याच देशामध्ये असेच कायदे लागू झाले पाहिजे हे अत्यंत महत्वाचे आहे.
बरं हे फक्त भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये मासिक पाळीला अपवित्र मानलं जातं. तसेच हिंदूच नव्हे इतरही धर्मात स्त्रिया व मुलींना पाळीच्या काळात अशुद्ध/ अपवित्र समजतात. जेव्हा स्त्रियांना पाळी येते तेव्हा त्यांना रोजच्या अनेक गोष्टींतून बेदखल केले जाते, महिलांना स्वयंपाक घरात प्रवेश नसतो, त्यांना सर्वांसोबत राहण्याची, बसण्याची मनाई केली जाते, कुणाशी गप्पा मारायलाही त्यांना स्वतःच्या घरात येता येत नाही.
या दरम्यान महिलांना घराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा घराबाहेरच्या खोलीत बसवलं जातं. तसंच नेपाळ मध्ये महिलांना या काळात मेनस्ट्र्युअल हट्स मध्ये म्हणजेच झोपडीत राहावं लागायचं. आणि ह्या अशा झोपडी गावाच्या बाहेर जंगलाच्या सीमेवर असते.
बरं हे फक्त गरीब कुटूंबांमध्येच होत नाही तर, पैश्याने श्रीमंत असलेल्या, आणि सर्वच जातींमध्ये ही ‘प्रथा’ दिसून येते.
या झोपडीच्या अवस्था पहिली तर लक्षात येते कि, मोडकळीस आलेली झोपडी जी बांबू आणि मातीपासून तयार केलेली असते, त्याला गवताचं छप्पर टाकलं जातं. या झोपड्यांना ना दारं असतात ना खिडक्या. अगदी जोराचा वारा आला तरी पडून जाईल अशी धोकादायक झोपडीत राहावं लागतं. बरं अंघोळ करण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी महिलांना लांब असलेल्या नदीवर जावं लागतं.
असल्या वाईट प्रथांमुळे महिलांना दर महिन्याला तारीख जशी जशी जवळ येणार तसं तसं त्या मानसिक तणावातून जात असत.
भारतातल्या अनेक राज्यांत अशा प्रकारच्या प्रथा, परंपरा,वागणुकी इतक्या प्रचलित आहेत की
महिलांना ते सवयीचं होऊन गेलं आहे. पण हे मात्र लक्षात कुणालाच येत नाही कि, महिलांना वाळीत टाकतांना त्या महिलेचा एक ‘माणूस’ म्हणून अस्तित्वच नाकारलं जातं.
प्रथा परंपरा काहीही असो परंतु कुणालाही अश्या प्रकारे वाळीत टाकणं हे माणुसकीच्या व्याख्येत बसतच नाही.
बरं आता पुन्हा पुन्हा तेच सांगावं लागतं कि, अनेकांना हे कळून नाही येत कि मासिक पाळी ही काही अपवित्र मानण्याची गोष्टच नाही. पाळी येणं हे तितकंच नैसर्गिक आहे जितकं नाकातून सर्दी झाल्यावर शेंबूड येणं.
भारतातील अनेक मागास जिल्ह्यांत या कुप्रथेचं बरीच भयंकर रूपं पाहायला मिळतात. त्यात गडचिरोलीमधील आदिवासी समुदायातील गोंड आणि माडिया आदिवासी या जमातींची समावेश आहे.
परंतु नेपाळ मध्ये झालेला प्रतिबंधक कायदा प्रभावी असेल की नाही हे अस्पष्ट आहे.
एवढ्या मोठ्या गुन्ह्यासाठी आरोपीला दोषी ठरवण्यात आले तरी त्याची शिक्षा फार गंभीर नाहीये.तीन महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा आणि फक्त ३,००० रुपये दंड.
लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य प्रकरणे या जर्नलमध्ये मागे प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार कायद्यात बऱ्याच समस्या आहेत असे सांगितले गेले. त्यांच्या या अभ्यासात असे आढळले आहे की, पश्चिम-मध्य नेपाळी मुलींपैकी ७७% मुली ज्या १४-१९ वर्षाच्या असणाऱ्या अशा ४०० मुलींचे सर्वेक्षणानुसार या मुली जबरदस्तीने या प्रथा पाळतात आणि त्यातील ६० % मुलींना हे माहित होते की हि प्रथा बेकायदेशीर आहे.
या कायद्यामुळे हि परिस्तिथी बदलेल का हे संशयास्पद आहे.
कारण दोषींना अटक करणे हा एक जलद आणि सोपा उपाय आहे, परंतु त्याचा दृष्टिकोन बदलणे, मानसिकता बदलणे, प्रथा बदलणे यास अनेक वर्षे लागतील. अटक करून, अशा काही झोपड्या जमीनदोस्त करून हि मानसिकता बदलणार नाही तर शेवटी एका सखोल सांस्कृतिक परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे.
हे हि वाच भिडू :