भारत पाकिस्तान फाळणीतून कोळीवाडा मासा फेमस झाला…
भारत पाकिस्तान फाळणी ही अनेकांच्या काळजाची भळभळती जखम मानली जाते. कित्येक कुटुंब उध्वस्त झाली याची काही गणतीच नाही. देशाने आजवर पाहिलेल्या क्रूर काळांपैकी एक काळ म्हणजे हि फाळणी. हजारो लोकांची ताटातूट झाली आणि बरेच जण या हिंसेला बळी देखील पडले.
सरदारजी बहादुर सिंग हेसुद्धा फाळणीच्या संकटाला बळी पडलेल्यांपैकी एक.
कोळीवाड्यात सगळेच व्यावसायिक कोळी राहत होते. मासेमारी करून उदरनिर्वाह तिथे चालत असे. याचं कोळीवाडयात बहादुर सिंग यांना कोळी लोकांनी रावस, पोंफ्रेट आणि कोळंबीची ओळख करून दिली. याच लोकांमध्ये राहून पाजींनी मासे बनवण्याचे विविध प्रकार शिकून घेतले.
आपल्याकडचे सिग्नेचर मसाले आणि हेरिटेज कुकिंग टेक्निक्स वापरून बहादुर सिंग नवनवीन डिशेस बनवू लागले.
बहादुर सिंग यांचा मुलगा कर्नल याने 2017 साली मुंबई मिररला एका मुलाखतीत सांगितल होतं की, घरगुती मसाल्यात एक रेसिपी त्यांनी तयार केली होती आणि त्या रेसिपी मधील मासे बहादूर सिंग बाहेर विकून यायचे. रावस फ्राय, पोंफ्रेट फ्राय आणि झिंगा फ्राय पानांमध्ये किंवा पेपर मधून सगळीकडे ते विकायचे. यात त्यांची डिश ही कोळीवाडा मासा किंवा कोळीवाडा डिश ही जास्तच हातोहात विकली जाऊ लागली.
घरगुती मसाल्यात बनवल्याने हातोहात ते मासे बहादूर सिंग यांच्या कडून विकले जाऊ लागले.
प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात कलाटणी मिळणारा क्षण येतोच येतो आणि तो क्षण बहादूर सिंग यांच्या आयुष्यात आला तो कसा तर, एकदा एका फाईव स्टार हॉटेल मध्ये त्यांनी बनवलेला कोळीवाडा मासा पोहचला. कोळीवाडा मासा रोजच्या रोज बहादूर सिंग यांच्याकडून ऑर्डर केला जाऊ लागला. माऊथ पब्लिसिटी मुळे तर जास्तच चर्चा होऊ लागली.
१९७० साली कर्नल सिंग आणि त्याचा भाऊ सुरजित सिंग यांनी मिनी पंजाब या नावाने सायन कोळीवाड्यात एक भोजनालय सुरु केलं. पुढे त्याचं नामकरण होत होत पंजाबी घेट्टो असं फायनल झालं. पुढें यात व्हरायटी म्हणून चिकन ॲड करण्यात आलं.
कोळीवाडा मासा असा फेमस होइल अस कोणालाही त्याकाळी वाटलं नाही. फक्त सामान्य लोकचं नाही तर फिल्म इंडस्ट्रीतीतील तेव्हाचे राज कपूर, धर्मेंद्र आणि बलराज साहनी हे त्या कोळीवाडा माशाचे भयंकर फॅन होते.
अनेकदा हे सेलिब्रिटी मंडळी कोळीवाडा मासा खायला त्या दुकानावर यायचे. १९८२ साली या सिंग बंधूंनी केट्रिंगचा बिजनेस सुरु केला आणि विशेष म्हणजे अक्षय कुमारचे वडिल हे त्यांचे पहिले कस्टमर होते.
सिंग कुटुंबाची तिसरी पिढी या व्यवसायात आली आणि हा व्यवसाय वाढतच गेला.
कोळीवाडा डिश फेमस झाली, पूढे त्याचे बांद्रा, मालाड, ठाणे आणि सोबतच मुंबईच्या इतर उपनगरात आऊट लेट्स निघाले. या व्यावसायिक कुटुंबातल्या सर्वात तरुण पिढीने मॉडर्न रेस्टॉरंट म्हणजे टर्बेन टेल्स आणि गार्ड मँजर सुरु केले आहेत. माऊथ पब्लिसिटी मुळे अमाप प्रसिध्दी झाली आणि हि डिश फेमस होत गेली.
कोळीवाड्यातील अशा या सीरिजमध्ये असणाऱ्या डिशेस या मानवतेच ट्रिब्यूट म्हणून ओळखल्या जातात. जी डिश एका शीख माणसाने शोधली पण नाव इथल्याच मातीच दिलं आणि लोकांनीही ती डिश डोक्यावर घेतली. मासे खाणारे लोकं आवडीने कोळीवाडा मागवता म्हणजे मागवताच. अशा प्रकारे भारत पाकिस्तान फाळणीतून कोळीवाडा डिश फेमस झाली.
हे ही वाच भिडू :
- सव्वा लाखाचा मासा मेल्याच्या दु:खामुळं उद्धव ठाकरेंनी आमदाराला भेटायचं टाळलं होतं…
- सैन्यातील पराक्रमासाठी दिले जाणारे परमवीर चक्र मराठमोळ्या सावित्रीबाईंनी बनवलं आहे
- फाळणीच्यावेळी दुरावलेले भाऊ जेव्हा भेटले तेव्हा पाकिस्तानलाही अश्रू अनावर झाले
- फाळणी वेळी पाकिस्तानात अडकलेल्या लोकांना स्वतःच्या विमानातून भारतात आणलं