संपुर्ण जग म्हणत होतं भारत पोलिओ-मुक्त होणार नाही तरिही आपण करुन दाखवलं

२४ मार्च २०१४ ही तारिख आहे भारत पोलिओमुक्त झाल्याची. भारतातील लोकसंख्येचा विचार करता विकसित राष्ट्राचं अस मत होतं की भारतासारखा देश पोलिओमुक्त होणं अशक्य कोटीतील गोष्ट आहे. तरिही भारतासारख्या भल्यामोठ्या लोकसंख्येच्या देशात ही गोष्ट शक्य झाली.

कारण…. 

१६ मार्च १९९५

या दिवशी भारतात पहिल्यांदा तोंडावाटे पोलिओचा डोस देण्यात आला. यापूर्वी इंजेक्शनद्वारे डोस देण्यात येत असे. पण अधिकाधिक लोकांपर्यन्त सहजरित्या लस घेवून जायची असेल तर त्यासाठी तोंडावाटे लस दिली पाहीजे याचा विचार करुन भारत पोलिओमुक्त करण्याच्या दिशेने पाऊले टाकण्यात आली.

तत्पुर्वी

WHO च्या १९८८ च्या जागतिक पोलिओ निर्मुलन मोहिमेला प्रतिसाद देत भारताने देशात पोलिओ निर्मुलन सुरू केले होते. भारताची लोकसंख्या क्षेत्रफळ आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची परस्थिती बघता भारत कधी पोलिओ मुक्त देश बनेल याबाबात जगभरात संशयाच वातावरण होतं.

परंतु WHO, World Bank यांसारख्या संस्थांच्या मदतीने भारताने स्वत: लस निर्मीती करण्यास सुरवात केली.

पोलिओ लसीची ठराविक तापमानात साठवणूक करावी लागली त्यासाठी देशभर वितरणाची साखळी निर्माण करण्यात आली. वितरणाची प्रमुख अडचण सोडवल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलिओ लस अभियानाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२००० ते २०१३ पर्यन्त भारतातील पोलिओ निर्मुलनासाठी World Bank ने ६४० मिलियन डॉलरचा पुरवठा केला. यातून भारताने दरवेळी मोठ्ठे मनुष्यबळ निर्माण करुन पोलिओमुक्त भारत घडवण्याचं काम केलं.

या मोहिमेसाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता होती त्यासाठी जवळपास २४ लाख स्वयंसेवक दिड लाख वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आलं. 

भारतासारख्या प्रंचड मोठ्या देशात वर्षातून दोन वेळा आणि ईशान्य भारतातसारख्या दूर्मिळ भागात वर्षातून चार ते पाच वेळा ही मोहिम राबवण्याचा स्विकार करण्यात आला. 

मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक होते म्हणून WHO च्या मदतीने सामान्य लोकांसाठी मार्गदर्शन राबवण्यात आले.

सुरवातीच्या काळात राजस्थान व ईशान्य भारतासारख्या भागात वेळेत लस पोहचवण्यासाठी भारतीय लष्कराने मदत केली.

पण यातही माती खाणारे लोक होते, पोलीओ म्हणजे लोकसंख्या नियंत्रण करण्याचा सरकारचा डाव आहे अशा अफवा पसरवण्यात आल्या. काही ठिकाणी यात अंमली पदार्थ असतात म्हणून सांगण्यात आलं. मात्र सरकारने या विरोधात लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली. पोलीओचा डोस गरजेचा असल्याचं लोकांपर्यन्त माध्यमांद्वारे पोहचवण्यात यश आलं.

आणि दिनांक २४ मार्च २०१४ रोजी भारत देश पोलिओमुक्त झाल्याचं घोषीत करण्यात आलं.

पोलीओ मुक्त करणं हा दिर्घकालीन टप्पा होता. मात्र आपण मिळून ही अशक्य गोष्ट पुर्ण करुन दाखवली. त्यामानाने कोरोनो रोखण्यासाठीची वेळ खूप कमी आहे. मात्र लोकांनी साथ दिली तर आपण ही गोष्ट देखील करुन दाखवू शकतो. कारण आज ैWHO पासून अनेक संस्थांच मत आहे की भारतात कोरोनाची साथ पसरली तर अटकाव करणं अशक्य होईल. पण इतिहास पाहता आपण काहीतरी अनपेक्षित करुन जगाला पुन्हा आश्चर्यचकित करु अस वाटतं. 

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.