या ५ कारणांमुळे जैन लोक एवढे श्रीमंत झाले…
भारतात एक गोष्ट तुम्हाला कधी जाणवलीये का? संख्येने फार थोडे असणारे लोक लय श्रीमंत असतात. म्हणजे त्यांची कम्यूनिटी छोटीच असते पण लोकं खूप श्रीमंत.
उदाहरण द्यायचं झालं पारसी समाज आहे, जैन समाज आहे. पण ह्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतात असा प्रश्न तुम्हाला पडतो का?
भारतात जैन लोकांची संख्या फक्त ०.३% इतकी आहे, आणि तरीही ही लोकं भारताच्या, इन्कम टॅक्सच्या एकूण आकडेवारीत सुमारे २४% इन्कम टॅक्स भरतात. गोल्ड इंडस्ट्री, डायमंड इंडस्ट्री, शेअर मार्केट, कमॉडिटी इंडस्ट्री, एयरलाइन इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्री, रीयल इस्टेट सेक्टर अशा अनेक सेक्टर्स आणि इंडस्ट्रीजमध्ये जैन समाजाची लॉबी आपल्याला पाहायला मिळते.
शिवाय इस्रोचे संस्थापक विक्रम सारभाई जैन धर्मीय होते, जगातल्या सगळ्यात जास्त श्रीमंत माणसांच्या यादीत येणारे गौतम अदानी जैन धर्माचे आहेत, भारतातल्या सगळ्यात मोठ्या फार्मासुटीकल कंपनीचे मालक दिलीप शंघवी जैन कम्यूनिटीचे आहेत, टाइम्स ग्रुपच्या ओनर इंदु जैन सुद्धा जैन आहेत, आणि जैन धर्मीयांची अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात.
जैन लोकं श्रीमंत असण्याचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा फंडा म्हणजे, त्यांचं ‘शिकेल तोच टिकेल’ हे धोरण.
एका रिसर्चनुसार आपल्याकडे हाययेस्ट लिटरसी रेट हा जैन कम्यूनिटीचा आहे. भारताचा साधारण लिटरसी रेट हा ६५.३८% आहे आणि यात फक्त जैनांचाच ९४% इतका आहे. शिवाय भारताचा फिमेल लिटरसी रेट ५४.१६% आहे तर जैनांचा फिमेल लीटरसी रेट ९०.६% एवढा आहे.
यावरून आपल्या काय लक्षात येतं, तर जैन कम्यूनिटी शिक्षणाला अनन्य साधारण असं महत्व देते. तुम्ही नोकरी करत असाल किंवा बिझनेस, शिक्षण हाच सगळ्याचा बेस असतो आणि तो पक्का असला की तुमची प्रगती निश्चित होते यावर जैन समाज ठाम असतो आणि त्यामुळे सुशिक्षित सुद्धा.
जैन समाजाचा दूसरा महत्वाचा फंडा म्हणजे ‘पेराल तेच उगवेल’
जैन धर्माची लोकं नोकरी करणारी नाही तर देणारी आहेत. त्यांना यूपीएससी करायचं नसतं, सरकारी नोकरी करण्यात रमायचं नसतं. त्यांच्यासाठी महत्वाचा असतो तो फक्त आणि फक्त धंदा. आणि हा त्यांचा माइंडसेट लहानपणापासूनच डेवलप होत असतो.
म्हणजे “मेरा बेटा आगे जाके, डॉक्टर या इंजिनियर बनेगा” या ऐवजी जैन लोकं, पाळण्यात पाहून “मेरा बेटा आगे जाके धंदा करेगा” असं म्हणत असणारेत हे फिक्स आहे.
बिझनेसच्या बाबतीतलं नियोजन आणि अंडरस्टँडिंग या जैन लोकांचं खूप लहान वयातच डेवलप झाल्यामुळे त्यांची प्रगती लवकर होते, आणि प्रगती झाल्यावर हाती पैसासुद्धा लवकर येतो.
जैन कम्यूनिटी श्रीमंत असण्याचा तिसरा फंडा म्हणजे त्यांची साधी राहणी उच्च विचारसरणी..
जैन कम्यूनिटीला मुळातच डिस्ट्रॅक्शन्स फार कमी असतात. पार्टी, पॉलिटिक्स, मजा मस्ती या पेक्षा योगा, मेडीटेशन, अध्यात्म यात त्यांना जास्त इंट्रेस्ट असतो. यामुळे मेन काय होतं, तर या लोकांचे वाढीव खर्च फार असे होतच नाहीत. नॉनवेज तर हे लोकं खातच नाहीत आणि बरेचसे जैन लोकं दारूही पित नाहीत त्यामुळे पैसे जास्त साठवलेच जातात आणि उडवले जात नाहीत.
शिवाय या सगळ्या व्यसनांमुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांचं प्रमाण सुद्धा साहजिकच कमी होतं, साध्या आणि हेलदी लाइफ स्टाइलमुळे डॉक्टर आणि हॉस्पिटल्सचाही खर्च वाचतो.जैन समाजाला पैसे कमावणं ते वाचवणं, आणि साठवणं याचं गणित पक्क ठाऊक असतं. आणि पैसा साठवणं म्हणजे एक प्रकारे पैसा कमावणं असतं म्हणूनही हे लोकं इतरांपेक्षा जास्त श्रीमंत असतात.
त्यांचा चौथा फंडा आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
कम्यूनिटी बिल्डिंग शिकावं तर ते जैनांकडून. मराठी माणसाबद्दल कायम एक तक्रार हमखास ऐकू येते, ती म्हणजे एकमेकांचे पाय ओढणं आपल्याकडे लय चालतं पण याच्या नेमकं उलटं हे जैनांचं असतं.
ते आपल्या कम्यूनिटीतल्या लोकांना जशी लागेल तशी मदत करायला कायम तत्पर असतात आणि एकत्र पुढे जातात. त्यांच्यावर त्यांच्या धर्माचा आणि संस्कारांचा प्रभाव असतो. शिवाय माणसांची, पैशांची आणि कामाची या लोकांना किंमत असते.
जैन लोकं स्वभावाने सुद्धा शांत आणि गोड बोलणारी असतात त्यामुळे, त्यांचं सगळ्यांशी जमतं आणि त्यांना सगळ्यांशी जुळवूनही घेता येतं आणि त्यांच्या या स्वभावाचा सगळ्यात मोठा फायदा होतो तो त्यांच्या बिझनेस वाढवण्याला आणि अल्टिमेटली ही लोकं कायम नफ्यात असतात.
जैन लोकांचा पाचवा फंडा आहे जगा आणि जगू द्या
जैन धर्म अहिंसेचा प्रचार करतो. पृथ्वीवरच्या कोणालाही किंवा कोणत्याही जीवाला त्रास होणार नाही म्हणून जैन धर्म कायम प्रयत्नात असतो. यासाठी लागेल तेवढं, आणि लागेल त्या गोष्टींसाठी सॅक्रीफाईज करण्याची सुद्धा त्यांची तयारी असते.
आणि हेच त्यांच्या बिझनेस मॉडेलवर सुद्धा रिफ्लेक्ट होतं, कसं तर कोणालाही हानी होणार नाही अशाच गोष्टीत ते शिरतात. आणि म्हणूनच जैन समाज जास्तीत जास्त बिझनेस करताना म्हणजेच व्यापार करताना किंवा ट्रेडिंग करताना दिसतो, जिथे या समाजाचा संबंध फक्त व्यवहाराशी येतो, ज्या व्यवहारात कोणालाही हानी पोहोचणार नसते तर फक्त फायदाच होणार असतो.
सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबनाऱ्या जैन समाजावर विश्वास ठेवणं सुद्धा इतरांना किंवा त्यांच्या सोबत बिझनेस करणाऱ्याला सहज शक्य होतं आणि परिणामी जैन समाजाची उत्तरोत्तर प्रगती होते. जैन समाजाला स्वतः सोबतच दुसऱ्यांच्या पैशांचीही तेवढीच किंमत असते त्यामुळे ते कोणाला फसवायला जात नाहीत आणि कोणाकडून फसलेही जात नाहीत.
थोडक्यात काय, तर जैन धर्मीय फक्त पैसे कमवून नाही, तर नाव कमवून, धर्म प्रतिष्ठा आणि स्वास्थ्य जपून सर्व बाजूने श्रीमंत असतात.
हे ही वाच भिडू: