लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शाहरूख म्हणाला, “चल गौरी आत्ता बुरखा घालं, इस्लाम कबूल कर…” 

बॉलिवूडमधील रॉमेण्टिक जोडी म्हणून शाहरूख आणि गौरी खानचा उल्लेख केला जातो. शाहरूखने अनेकदा आपलं प्रेम कसं जुळलं आणि त्यानं गौरी साठी काय काय केलं सांगत असतो. त्याने दोघांच्या लग्नातला असाच एक किस्सा आपल्या मुलाखतीत सांगितला होता.. 

आपल्या एका मुलाखतीत शाहरूख सांगतो की आमच्या लग्नाच्या रिसेप्शनची पार्टी आयोजित करण्यात आली होती.

तेव्हा या पार्टीत सर्वांच्या समोर शाहरूख गौरीला म्हणाला होता की, 

चल गौरी आत्ता बुरखा घाल… तुला इस्लाम स्वीकार करायचा आहे.. आणि हो आत्ता तुझं नाव आएशा असणार आहे आणि इथून पुढची तुझी सगळी लाईफस्टाईल मुस्लीम धर्माप्रमाणेच असणार आहे.. 

ही गोष्ट ऐकताच गौरीच्या पाहुण्यामंडळीसह गौरीच्या पण चक्कीत जाळ झाला होता. लग्नाच्या पूर्वी शाहरूखची अशी कोणतिही अट नव्हती पण अचानक शाहरूख धर्म बदलण्याच्या गोष्टी कशा काय करू लागला… 

याच उत्तर देखील शाहरूखने आपल्या मुलाखतीत दिलं आहे.. 

शाहरूख म्हणतो, 

झालेलं अस की मी धर्माने मुस्लीम तर गौरी धर्माने हिंदू असल्याने दोन्ही बाजूचे लोकं या रिसेप्शनमध्ये होते. तेव्हा गौरीचे काही पाहूणे गौरीला आत्ता मुस्लीम धर्म स्वीकार करावा लागणार अशी चर्चा करत होते. गौरीचं नाव बदलण्यात येणार, तिला मुस्लीम धर्म स्वीकारावा लागणार अशा चर्चा कानोकानी सुरू होत्या. आलेल्या या पाहूण्यांची फिरकी घेण्यासाठी शाहरूखने एक प्रॅन्क करायचं ठरवलं… 

तेव्हा शाहरूख गौरीला सर्वांच्या समोर जावून इस्लाम धर्म कबूल करण्याविषयी बोलला. तुझं नाव आजपासून आएशा झाल्याचं देखील सांगितलं. गौरीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह बघुन आपण पाहूण्यांच्या चर्चेमुळं प्रॅन्क केल्याचं स्पष्ट केलं… 

शाहरूख म्हणतो धर्माच्या नावाने प्रेम मोजणाऱ्यांची चेष्टा करावी अस मनात आलं आणि त्यासाठी मी हा प्रॅन्क केला होता.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. vighnesh says

    aaj che 3nhi lekh short and sweet aahet

Leave A Reply

Your email address will not be published.