मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा निर्णय बाळासाहेबांमुळे थांबला होता..
बोलभिडू मार्फत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेतली.
बोलभिडूच्या युट्यूब चॅनेलवर ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सुरवातीच्या काळातील पत्रकारिता, क्राईम पत्रकारिता करत असताना बिहार मध्ये आलेले अनुभव याचसोबत शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक किस्से मुलाखतीदरम्यान खा. संजय राऊत यांनी उलघडून सांगितले आहे.
अशीच एक आठवण सांगत असताना गुजरात दंगलीनंतर जेव्हा नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची मोदींनी भेट घेतली होती. या भेटीनंतरच मोदींना हटवण्याच्या हालचाली थांबवण्यात आल्याचा किस्सा त्यांनी बोलून दाखवला…
इथे तुम्ही संपुर्ण मुलाखत पाहू शकता,
हे ही वाच भिडू
- गुजरात दंगलीत मोदींना क्लिनचिट देणारे आता अंबानी प्रकरणाचा तपास करणार
- ठाकरेंच्या आजोबांनी मुंबईत चक्क गुजराती लोकांसाठी झुणका भाकर सुरु केलं होतं.
- वाजपेयी अडवाणींनी जमवलेले मित्रपक्ष मोदी-शहांना का टिकवता आले नाहीत?