जो पैलवान मस्ती पचवतो तोच खरा आदर्श मल्ल अथवा अनेकांचा सुशिल कुमार होतो
भारताला दोन ऑलिंपिकची पदकं त्याने अपार लढून आणली. देशातल्या प्रत्येक कुस्तीगीराचा तो आयडॉल ठरला. तसा माझा ही होता ; काही एक वर्ष.
होय, सुशिल कुमार बद्दल बोलतोय मी. ज्याला देशानं बक्षिसानं मडवलं. सरकारनं मान, सन्मानाने पुरस्कार दिले. आज त्याच सुशिल कुमारवर बक्षिस लावलं गेलं. कुणी ? तर दिल्ली पोलिसांनी. का ? तर एका ज्युनिअर मल्लांच्या हत्येचा त्यावर आरोप आहे.
अन् तो गेल्या वीस दिवसापासुन फरार होता. दिल्ली पोलिस त्याच्या मागावर होते. तो परदेशी पळून जाऊ नये म्हणुन त्याचं पासपोर्ट ही गोठवलं गेलं. त्याची माहिती देणाऱ्याराला पोलिसांनी बक्षिस जाहिर केलं. किती मोठ्ठं हे दुर्दैव अन् नामुष्की म्हणावी लागेल.
बाकी सतपाल सारख्या खुप जाणत्या वस्तादाचा तो पठ्ठा.
शेवटी याच वागण्यातून त्याच्या कडून हा गुन्हा घडला असावा.
पण सतपाल नावाची कपटी वृत्ती महाराष्ट्राला नेहमी मारक ठरली.
याची उदाहरणे पश्चिम महाराष्ट्राने पाहिली आहेत.
वाळू व्यवसाय, रिअल इस्टेट, बाजारपेठा, सुरक्षा अशा अनेक ठिकाणी माजी मल्लांनी आपली ठेकेदारी सुरु केली आहे. हा व्यवसाय करताना अनेकांनी आपल्या बळाचा वापर केला आहे. हे स्पष्ट आहे. त्यांना ते भोगावं ही लागते. शेवटी कायद्या पुढे कोणीच मोठा नाही.
जो व्यक्ती हे सुत्र शेवट प्रयत्न पाळतो तोच खरा पैलवान!
पै. मतीन शेख. ९७३०१२१२४६ ( फेसबुकवरून साभार)
हे ही वाच भिडू