भारतभरात दुध क्रांती आणली, पण अखेरपर्यंत दुधासारखे स्वच्छचं राहिले
‘अमूल दूध पिता है इंडिया..’ भारतातली टॉपची दूध कंपनी ‘अमूल’च्या जाहिरातीतलं हे गाणं लहान पोरग सुद्धा गुणगुणत असतंय. दूध किंवा दुधाचे प्रोडक्ट घायचे म्हंटलं कि , लोक आजही डोळे झाकून अमूल वर विश्वास ठेवतात. कंपनीनं ग्राहकांचा हा विश्वास जिंकलाय तो भारताचे ‘मिल्क मॅन’ वर्गीस कुरियन यांच्यामुळं.
‘श्वेत क्रांतीचे जनक’ वर्गीस कुरियन यांच्या प्रयत्नांमुळेचं भारत आज जगातील दूध उत्पादक देशांमध्ये टॉपला आहे. त्यांनी शिशु सहकारी दूध उत्पादक संघासाठी प्रक्रिया प्रकल्प स्थापन केला आणि भारतातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा विकास जमिनी स्थरावरून उंचावला.
कुरियन यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ साली कालीकटमधील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये मास्टर झालेले डॉ. कुरियन यांनी एका भारतीय राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्था अशी काही उभी केली कि, १९४९ नंतर त्यांनी कधीही मंदीचा काळ पहिला नाही.
वर्गीस कुरियन हे ‘ऑपरेशन फ्लड’ या जगातील सर्वात मोठ्या दुग्ध विकास कार्यक्रमाचे शिल्पकार होते. डॉ. कुरियन यांनी आनंद (गुजरात) सहकारी दुग्धविकासाची स्थापना केली,
दुधाव्यतिरिक्त, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने (NDDB) धारा’ च्या नावाने तेलाचा व्यवसाय सुरू केला, त्यावेळी त्यांचे अनेक दुश्मन तयार झाले. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी बरेच काही गमावले होते.
डॉ. कुरियन यांच्या एब्रिल एसजे या खास मित्राने एक वृत्तवाहिलीला दिलेल्या मुलाखतीत असाच एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितलं कि, ‘कुरियन प्रामाणिक व्यक्ती होते. त्यांच्या या कामात जो कोणी त्यांना मदत करायचा त्याच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. असाच एक व्यक्ती म्हणजे छोटानी. जे डॉ. कुरियन यांना या कामात मदत करत होते.
एका प्रसंगी छोटानी ट्रेनने प्रवास करत होते आणि त्यांना त्याच चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले. त्यावेळी असे म्हंटले गेले होते कि,’धारा’ प्रकल्पाच्या दुश्मनांच हे काम होत. या घटनेमुळे डॉ. कुरियन यांच्याही जीवाला धोका होता. हे लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेसाठी बॉडी गार्डची व्यवस्था केली जात होती. पण त्यांनी नकार दिला.
त्यांचा नशिबावर भरवसा होता.ते म्हणायचे कि, ‘मला काही व्हायचे असेल तर ते होऊनच राहील, कोणताही बॉडी गार्ड त्याला रोखू शकत नाही आणि मी या प्रकल्पातून मागे हटणार नाही.’
यानंतर त्यांचा तेल प्रकल्प कसा यशस्वी झाला हे सगळ्या जगाने पाहिलेय.
असाच आणखी एक किस्सा शेअर करताना एब्रिल सांगतात की, ‘मी काही वेळापूर्वी चेन्नईला कामा निमित्ताने गेलो होतो. म्हणून मी त्यांच्या घरी पण गेलो. निर्मलाचा चेन्नईमध्ये एक छान फ्लॅट होता, ज्याची किंमत सुमारे ४० लाख होती.
तिने एब्रिल यांना सांगितले की, तिचे वडील म्हणजेच डॉ. कुरियन यांच्याकडे हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, म्हणून त्यांनी त्यांच्या भविष्य निधीतून कर्ज घेऊन हा फ्लॅट खरेदी केला.निर्मलाने म्हंटले कि, माझे वडील वेगळ्याच स्वभावाचे व्यक्ती आहे.
एब्रिल यांनी म्हंटलं कि, निर्मलाचं बोलणं सुद्धा खरं होत म्हणा, कारण कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या व्यक्तीला स्वत: साठी फ्लॅट खरेदी करण्यासाठी त्याच्या खात्यात पुरेसे पैसेही नसावेत. ही आश्चर्याची गोष्ट आहे. याचं कारण म्हणजे, कुरियन त्यांच्या तत्त्वांपासून कधीही विचलित झाले नाही आणि त्यांना माहित होते की, त्यांचे कुटुंबही त्यात आहे आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देईल.
हे ही वाचं भिडू :
- अमुलच्या आधी आख्या देशात पॉलसनचा बोलबाला होता.
- एसटी स्टँडवर मिळणाऱ्या यळगुड दुधाने गेल्या ५० वर्षात स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय.
- दिल्लीत दूध वाटणाऱ्या पोराने राजकारणात राजेश पायलट होवून दाखवलं