इंडियन आयडल विजेत्या संदीप आचार्यने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता…

भारतात रियालिटी शोजचं वाढलेलं वारं बघता सिनेमा , वेबसिरीज, सिरियल्स या शोज पेक्षा रियालिटी शो सगळ्यात जास्त मार्केट खाऊन जातं. कारण जे सिनेमा, सिरीयल, वेबसिरीज मध्ये असतं त्याचा बऱ्यापैकी कंटेंट हा रियालिटी शो मध्ये असतो म्हणजे तुम्ही नीट बघा ड्रामा आहे, रडणं आहे,गाणी आहे, इमोशनल स्टोरी आहे, विनोद आहे, नाच आहे असं सगळं पॅकेजच्या पॅकेज रियालिटी शोला आहे.

पण या रियालिटी शोजचा सगळ्यात मोठा शो म्हणजे इंडियन आयडल. 

आत्ताच इंडियन आयडल गाणी कमी आणि भांडणं आणि रडण्याने जास्त फेमस झालं. म्हणजे नेहा कक्करचे मिम्स तुम्ही पाहिलेच असतील यात काय शंका नाही. अनु मलिकचा आग लगा दे गा वाला सीन सुद्धा तुम्हाला माहिती असेल बरं सध्या या दोघांचा विषय नाही तर विषय आहे एका अशा इंडियन आयडलचा ज्याच्या आवाजाने भारत वेडा झाला होता पण वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी त्या आयडलला आपला जीव गमवावा लागला होता.

इंडियन आयडॉल जिंकून प्रसिद्ध झालेल्या आणि वयाच्या 29 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेला संदीप आचार्य आठवतोय का ?

या ट्रेंडच्या जमान्यात प्रवृत्तीपासून मागे राहिलेली प्रत्येक घटना आणि व्यक्ती विसरली जाते. काही काळासाठी, आपण कोणालाही स्टार बनवतो, परंतु जसे आपण ट्रेंडमधून बाहेर पडतो तेव्हा आपण ते पूर्णपणे विसरतो. अशाच एका सुरांच्या सरताजला आपण आधी डोक्यावर घेतलं आणि नंतर पार विसरून गेलो इतकं की तो निधन पावल्यावर लोकांना तो आठवला.

आजच्या काळात इंडियन आयडॉल सिंगिंग शोचे १२ सीझन पूर्ण झाले आहेत. शोच्या चाहत्यांइतकीच त्यावर टीकाही झाली होती, पण शोच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे चाहते खूप होते. याच शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये नेहा कक्करही दिसली होती. आज यशाची शिखरे गाठणारी नेहा त्यावेळी इंडियन आयडॉलच्या तिसऱ्या फेरीतून बाहेर पडली होती. तेव्हा तिच्या आवाजाला टक्कर देणारा आवाज होता तो संदीप आचार्य यांचा. तोच संदीप आचार्य ज्याने इंडियन आयडॉलचा दुसरा सीझन जिंकून सर्वत्र दहशत निर्माण केली होती.

संदीप आचार्यचा आवाज जितका मधुर होता तितकाच त्यांचा स्वभावही साधा होता. चेहऱ्यावर मंद हास्य असलेल्या या गायकाने संपूर्ण देशाची मने जिंकली होती. राजस्थान, बिकानेर येथे राहणारे संदीप आचार्य यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1984 रोजी झाला. ‘इंडियन आयडॉल’चा दुसरा सीझन जिंकून तो रातोरात प्रसिद्धी पावला. हा शो जिंकल्यावर त्याला सोनी बीएमजी या उत्तम कारसोबत एका म्युझिक अल्बमसाठी एक कोटींचा करार मिळाला.

ही गायन स्पर्धा अर्थात इंडियन आयडल जिंकल्यानंतर संदीपची कारकीर्द खूप पुढे जाणार होती पण कोणास ठाऊक हा मुलगा अगदी लहान वयातच हे जग सोडून जाणार होता. 15 डिसेंबर 2013 रोजी 29 वर्षीय संदीपने या जगाचा निरोप घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संदीपला काविळीचा त्रास होता. त्यांना गुरुग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की त्याला नंतर वाचवता आले नाही. खरं तर, ज्यावेळी संदीपची प्रकृती खालावली होती, त्या वेळी तो बिकानेरमध्ये एका लग्नाला गेला होता. यादरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना घेऊन रुग्णालयात धाव घेतली. मात्र त्यांना वाचवता आले नाही.

इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर संदीप आचार्यचे आयुष्य बदलले. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, तो एका शोसाठी 2.5 ते 3 लाख रुपये घेत होता आणि तो एका वर्षात 60 ते 65 शो करत होता. त्याने देशातच नव्हे तर परदेशातही धुमाकूळ घातला. संदीपने इंग्लंड, अमेरिका, दुबई, आफ्रिका, इंडोनेशिया आणि नेपाळसह अनेक देशांमध्ये परफॉर्म केले होते. गायनासोबतच संदीप आचार्य यांनी अभिनय क्षेत्रातही हात आजमावायला सुरुवात केली. सोनी टीव्हीच्या कैसा ये प्यार है मध्ये त्याने काम केले होते. याशिवाय त्यांनी मेरे साथ सारा जहाँ’ आणि ‘वो पहली बार’ हे दोन सोलो अल्बम रिलीज केले होते.

अजून बरेच इंडियन आयडल येतील जातील, पण त्याकाळात त्या सिझनला नेहा कक्करला मागे टाकून विजेतेपद मिळणारा संदीप आचार्य लोकांच्या दिर्घकाळ लक्षात राहील.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.