योजना मोदी सरकारने आणली पण कोरोना काळात सर्वाधिक फायदा दक्षिणेच्या राज्यांनी उठवलाय.

जगाबरोबरच देशावर कोरोनाचं संकट आलं आणि प्रत्येकाला आप-आपल्या आरोग्य यंत्रणाबद्दलची सत्य परिस्थिती पाहता लक्षात आलं कि, कोण किती पाण्यात आहे.

अनेक राज्यांमध्ये बेड,ऑक्सिजन, इंजक्शन यांच्या अभावाने अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाला हे वास्तव आहे हे आपणही जाणून आहोत …

कारण त्यातले कित्येक रुग्ण आपल्या ओळखीचेच होते.

त्यात अजून एक संकट म्हणजे गरीब आणि सामान्य वर्गाची झालेली आर्थिक ओढाताण हि तितकीच वाईट होती. कोरोनाच्या महागड्या उपचारामुळे कित्येक लोकांची जवळ थोडीफार असलेली सेविंग हि संपली त्यामुळे आरोग्यासंबंधात असणाऱ्या योजनांचा सामान्य नागरिकांना कितपत फायदा झाला हा प्रश्न डोक्यात येतोच येतो !

त्यात एक महत्वाची योजना म्हणजेच, आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना. 

२०२० च्या सुरुवातीच्या महिन्यांत जेव्हा देशात कोरोनाचे आकडे वाढतच होते आणि उपचार हि महागडे असल्याकारणाने केंद्र सरकारने आयुष्मान योजनेअंतर्गत कोरोना रुग्णांचे उपचार करण्याची घोषणा केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आला होता.

परंतु खरंच कोरोना रुग्णांना ह्या योजनेचा म्हणावा तितका फायदा झालाय का ?

केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात कोविड १९ च्या उपचारांसाठी आयुष्मान भारत – जन आरोग्य योजना  अंतर्गत २२२३.५७ कोटी रुपये खर्च केले होते तर मग या योजनेचे मुळात नेमके लाभार्थी किती असतील यासंबंधी आजतक, इंडिया टुडे यांनी माहिती अधिकाराचा वापर करुन चौकशी केली असता अशी माहिती समोर आली आहे. 
आरटीआय चौकशी उघडकीत उघडकीस आले कि,
या योजनेचा लाभ सर्वात जास्त दक्षिणेकडील राज्यांतल्या रुग्णांनी घेतला आहे. त्या योजनेअंतर्गतले लाभार्थी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक,केरळ या राज्यातले आहेत. तुलनेने या राज्यांची आणि महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या पहिली तर यात महाराष्ट्र मागे आहे हा खुलासा यातून होतो.
कार्यकर्ते विवेक पांडे यांनी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या आरटीआयनुसार एप्रिल २०२० ते पहिल्या २०२१ पर्यंत ६.५ लाखाहून अधिक लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत योजनेंतर्गत मोफत कोविड उपचाराचा लाभ घेतला आहे, तर १७,७३ लाख लोकांना मोफत चाचणीद्वारे लाभ मिळाला आहे.

तर बिहार मध्ये फक्त १९ कोरोन रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती या RTI चौकशीतून बाहेर आली आहे.

तसेच गुजरात,मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये या योजनेबाबतची स्थिती काही वेगळी नाही, परंतु आपण दक्षिणेकडील राज्यांबाबत बोलायचं झालं तर,
कर्नाटक मध्ये आतापर्यंत सर्वाधिक लाभार्थी  १,६२,५० आहेत ज्यांना आरोग्य योजनेंतर्गत कोविड उपचार मिळाले आहेत आणि गेल्या वर्षभरात ७७०.६० कोटी रुपये खर्च केले आहेत, ही सर्वात जास्त असलेली रक्कम पीएमजेवायसाठी अधिकृत आहे, अशी माहिती आरटीआयने दिली. तर केरळमध्ये ३४,७५५ चाचण्या झाल्या आणि त्यातून ३३,९५० लोकांना फायदा झालेला आहे, यासाठी केरळला आतापर्यंत १८१.०५ कोटी रुपये अधिकृत केले गेले होते. तर आंध्र प्रदेशने ४१३,९८ कोविड रूग्णांच्या उपचारासाठी १,५४,७६० कोटी रुपये खर्च केले आहेत.
तसेच तामिळनाडू मध्ये सर्वाधिक १७.७३ कोविड चाचण्या म्हणजेच घेण्यात आल्या.  जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत १५.८४ लाख लोकांना या योजनेअंतर्गत चाचणीचा फायदा झाला आणि यासाठी आतापर्यंत ५१५ कोटी रुपये खर्च झाले. तसेच योजनेंतर्गत सुमारे १०,७३० जणांवर कोविड उपचार करण्यात आले आहेत. 
आता महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर,
राज्यात या योजने अंतर्गत या एका वर्षात चाचणी  करणारे १,२५,२१३  असून लाभार्थी हे १,६१,२३४ इतके आहेत. यावर ४२४,३९  कोटी रुपये खर्च झाले आहेत. 
महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतचे कोविड केसचे प्रमाण सर्वाधिक आहे, ५९.१ लाख महाराष्ट्रात तर कर्नाटकमध्ये २७ लाख केस, केरळ २७.३ लाख केसेस, तामिळनाडू २३.५ लाख प्रकरणे आणि आंध्र प्रदेश १८.१ लाख केसेस आहेत.
सध्या सुरू असलेल्या कोविड १९ साथीच्या रोगामुळे लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. गोरगरीब लोकांना मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केली गेली. या आरटीआय दाखल करण्याचे मुख्य कारण म्हणजे या योजनेचा किती लोकांना फायदा झाला याची माहिती मिळवणे हा होते.
या योजनेचा फायदा काही राज्यांना झाला तर इतर अनेक राज्य हा फायदा घेण्यात अपयशी ठरले.

का ? 

तर वरील आकडेवारी पाहिली तर असं लक्षात येते कि, याला अनेक कारणे आहेत ती अशी कि,

कोरोनासारख्या नव्या आजारावर उपचार करण्याची सुविधा अनेक रुग्णालयांमध्ये नाही. काही लोकापर्यंत हि माहितीच पोहचली नाही कि कोणती रुग्णालये या योजनेच्या पॅनेलमध्ये आहेत. 

अजून एक कारण असं कि, रुग्णालयांना या पॅनेलमध्ये जायचच नाही कारण सरकारकडून अनेक बिलांची थकबाकी असल्यामुळे खाजगी रुग्णालये ह्या योजनेत येण्याचं टाळतात.

यामुळेच कोविड रुग्णांचे आयुष्मान कार्ड बहुतेक रुग्णालयांनी स्वीकारले नाही.

याबद्दल अनेक घटना समोर आल्या आहेत कि, कोविडवर उपचार करणारी अनेक खासगी रुग्णालये आयुष्मान कार्ड स्वीकारतच नाहीयेत.

कोविडची दुसरी लाट आली आणि यावरचे उपचारही महागले, बऱ्याच खाजगी हॉस्पिटल्स मध्ये आयसीयू बेडसाठी रूग्णांनी दररोज पन्नास हजार रुपये देऊ केले, अशात आयुष्मान भारत योजने अंतर्गत पाच हजार रुपयांना बेड देण्यास कोणतेही खाजगी हॉस्पिटल कसे काय तयार होईल ?

अजून एक कारण असंही लक्षात घेतलं पाहिजे कि,  कोविड रुग्णांना उपचार लवकरात लवकर आणि जवळ हवे असण्याची आवशक्यता असते त्यामुळे लोकांची प्रायोरिटी हि योजनेतूनच उपचार मिळावेत हि नव्हती तर रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळावेत हि होती. त्यामुळे ह्या आपत्कालीन परिस्थितीत या योजनेचा लाभ घेण्यात आपण कमी पडलो किंवा शासन हि कमी पडले असे म्हणणे योग्य ठरेल.

त्यामुळे ही योजना अपयशी ठरल्याचे दिसून येते !

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.