‘लेडी बोस’ने प्रयत्न केले म्हणून महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला
तुम्हाला जर कुणी हा प्रश्न विचारलाच, स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाचा मापदंड कोणता ? अर्थातच स्त्रियांचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास. हे उत्तर बोलायला जितकं सोपं जातं तितकंच गंभीर आहे.
असो तर इतर गोष्टींबद्दल खोलात न जाता आपण थेट मुद्द्यालाच सुरुवात करूया तो म्हणजे स्त्रियांचा मतदानाचा अधिकार !
भारतात महिलांचा राजकारणातला सहभाग आणि त्यांचा मतदानाचा टक्का दोन्ही गोष्टी तितक्याही सकारात्मक नाहीयेत. राहिला मुद्दा मतदारसंघातील महिलांच्या राखीव जागांचा तर त्याच वास्तवही लपलेलं नाहीये.
राखीव जागा लागल्या की त्याठिकाणी आपल्या बायकोला निवडून आणून स्वत: कारभार हाकणाऱ्यांची संख्या कमी नाहीए तरीही याच राखीव जागांमुळे महिला राजकारणात येवू शकतात हे देखील तितकच खर आहे. आज राजकारणात महिलांना थोडेफार चांगले महत्व आले आहे…कशामुळे ? मतदानाचा अधिकारामुळे आणि त्यांनी घेतलेल्या राजकीय क्षेत्रातील पुढाकारामुळे.
पण एक काळ असाही होता जेंव्हा भारतात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता…
पण महिलांना मतदानाचा हा अधिकार मिळाला तो अबला बोस यांच्यामुळे..
अबला बोस यांचा जन्म ८ ऑगस्ट १८६५ चा. त्यांच्या वडिलांच नाव दुर्गामोहनदास. दुर्गामोहन हे ब्राम्हो समाजाचे नेते होते. तर अबला बोस यांच्या आई या विधवा पुर्नविवाह, विधवांचे पुर्नवसन या समाजकार्यात सक्रीय होत्या. अबला दहा वर्षाच्या असतांनाच त्यांची आई वारली. पण महिलांच्यासाठी काहीतरी चांगलं करण्याचं बाळकडू त्यांना लहानपणीच मिळालं होतं..
त्यांचे बालपणच महिलांना शिक्षणाचा अधिकार, उच्चशिक्षण अशा विचारात गेलं होतं. अबला देखील प्राथमिक शिक्षण घेवून बेथ्थून कॉलेजात गेल्या. तिथे मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण घेवून पुढे मद्रास विश्वविद्यालयात गेल्या.
पण याही पेक्षा पुढं जाऊन पाहणं देखील गरजेचं आहे की, भारतीय समाजात त्यांचं योगदान अमूल्य आहे.
त्यांच्या प्रयत्नांमुळे महिलांना मताधिकार मिळाला
त्यानंतर १९२१ मध्ये बॉम्बे आणि मद्रासमध्ये महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला…आणि महिलांना मताधिकार देणारे हे पहिले प्रांत ठरले.
त्याचवेळी अबला बोस यांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा लावून धरला. आणि त्याचे फलित म्हणजे १९२५ पर्यंत बंगालच्या महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळाला आणि १९२६ मध्ये संपूर्ण देशातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
स्वातंत्र्यानंतर भारतातील महिला शिक्षित, स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावेत यासाठी अबला यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांच्या कल्पना स्वातंत्र्यानंतर सरकारी धोरणांचा अविभाज्य भाग बनल्या.
अबला बोस कायमच म्हणत की स्त्री एखाद्याची पत्नी आणि सून होण्याएवढी मर्यादित नसून स्त्रियांना दिलं जाणारं शिक्षण महत्वाचं आहे. समाजामध्ये ज्या स्त्रिया कायमच दुय्यम दर्जावर जगत आल्या, त्या स्त्रियांसाठी झटणाऱ्या एक अग्रणी म्हणून अबला बोस यांना मानलं जातं.
हे ही वाच भिडू :