महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला पक्ष वाटतो, तरी राष्ट्रवादीला ‘राष्ट्रीय पक्षाचा’ दर्जा कसा?

राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. भलेभले पक्ष अजूनही प्रादेशिक पक्ष म्हणून गणले जात असताना राष्ट्रवादी पक्ष हा राष्ट्रीय पक्ष कसाकाय हा प्रश्न सहजपणे लोकांना पडत असतो. उत्तर पण साहजिक आहे.

राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रापूरता मर्यादित तरिही राष्ट्रीय पक्ष कसाकाय?

याच प्रश्नांच उत्तर शोधण्यासाठी इतिहासापासून पाहावं लागतं..

साधारण वीस ऐक वर्षांपूर्वी काँग्रेस मध्ये सत्तानेतृत्वासाठी संघर्ष झाला होता. यात सोनिया गांधींना परदेशी करार देऊन शरद पवार, पी. ए संगमा आणि तारीख अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नामक सवता सुभा उभा केला.

१९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा या पक्षाकडून खूप जास्तीच्या अपेक्षा होत्या. त्याचं कारण म्हणजे त्यादरम्यान काँग्रेस पक्ष वाईट काळातून जात होता. त्यामुळे काँग्रेस सोडून इतर राजकीय नेत्यांचं आपल्याला समर्थन मिळेल अशी राष्ट्रवादीला अपेक्षा होती.

जेंव्हा कोणत्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, तेंव्हा आपला पक्ष अधिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असाही विश्वास होता.

पण राष्ट्रवादीला ना काँग्रेसचा पाठिंबा मिळाला ना राष्ट्रीय राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावण्याची संधी मिळाली. १९९९ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल.

राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनेनंतर लगेचच महाराष्ट्रातील परिस्थिती बघून काँग्रेसशी समझोता केला होता. अधूनमधून वाद झाले मात्र ही युती आजही कायम आहे.

असा समझोता जरी राष्ट्रवादीने करून घेतला असला तरीही राष्ट्रवादीने महाराष्ट्रात तर जम बसवलाच पण ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं यावरही लक्ष दिलं.

शरद पवार यांनी संगमा आणि अन्वर यांच्या रुपाने मेघालय आणि बिहारमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं.  मात्र २००४ साली पवार आणि संगमा यांनी आपले वेगवेगळे मार्ग निवडले. संगमांनी नॅशनल पीपल्स पार्टी काढली तर तारीख अन्वर २०१८ मध्ये काँग्रेसवासी झाले. 

यानंतरही राष्ट्रवादीने गोवा, गुजरात, लक्षद्वीप यांसारख्या भाजपचा गड असलेल्या राज्यात राष्ट्रवादीचे खासदार आमदार निवडून येतात.

लोकसभेच बघायला गेलं तर,

गेल्या २१ वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सुरक्षित आणि लहान राज्यांची निवड केलेली दिसते. 

– १९९९ सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १३२ जागा लढवल्या होतंय त्यातील एकूण ८ उमेदवार निवडून आले होते, त्यातील ६ महाराष्ट्रातून तर मेघालयमध्ये -१, मणिपूरमधून -१ खासदार निवडून आलेला. 

– २००४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ३२ जागा लढवल्या आणि त्यापैकी ९ उमेदवार निवडून आलेले मात्र महाराष्ट्राबाहेर एकही उमेदवार निवडून आला नव्हता.

– २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ६८ उमेदवार उतरवले मात्र ९ उमेदवार निवडून आले होते. त्यापैकी ८ महाराष्ट्रातून ७ तर मेघालयमधून १ खासदार निवडून आलेला.

– २०१४ साली आलेल्या मोदी लाटेचा मोठा तडाखा महाराष्ट्रात संयुक्त पुरोगामी आघाडीला बसला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातून फक्त ४ खासदार निवडून आले होते. 

मात्र याच दरम्यान बिहारच्या कटिहारमधून तारिक अन्वर आणि लक्षद्वीपमधून पी. पी. मोहम्मद फैजल निवडून आले होते.

अशाप्रकारे २०१४ मधील राष्ट्रवादीचं संख्याबळ ६ वर गेलेलं.

२०१९ मध्ये राष्ट्रवादीने ३४ जागेंवर आपले उमेदवार उभे केलेले त्यापैकी ५ च उमेदवार निवडून आलेले  तर ४ खासदार राज्यसभेत निवडून गेलेले आहेत. थोडक्यात ५४३ सदस्य संख्येपैकी राष्ट्रवादीचे फक्त ५ खासदार आहेत.

आणि या ५ पैकी १ खासदार हा लक्षद्वीपचा आहे. त्यांचं नाव म्हणजे खासदार पी.पी. मोहम्मद फैज़ल !

आता विधानसभेतली ताकद बघूया…

पश्चिम बंगाल – पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली आणि काँग्रेस जवळपास संपवून टाकली. तृणमूल काँग्रेस सत्ताधारी पक्ष बनला. तिथे राष्ट्रवादीचा काही विषयच नाही.

आंध्र प्रदेश-  जगन मोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशात वाय एस आर पक्षाची स्थापना केली आणि दुसरीकडे काँग्रेस जवळपास संपली. मात्र असा करिष्मा किंवा जादू राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात करता आली नाही.

गुजरात – गुजरात मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशीच आघाडी नेहमी दिसून आली. अलीकडच्याच म्हणजे २०१७ आणि २०१२ ची गुजरात विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करुन लढवली होती.  २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९ उमेदवार निवडून आले होते. २०१७ मध्ये तर फक्त १ च आमदार निवडून आला.

केरळ – केरळ मध्ये २०२१ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले. ए. के. शशींद्रन आणि थॉमस के. थॉमस.

मणिपूर – मणिपूर विधानसभेत राष्ट्रवादीचे ४ आमदार आहेत.

झारखंड – झारखंडमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ७ जागा लढवल्या होत्या त्यातील १ च जागा जिंकता आली. तर मणिपूर मध्येमणिपूर विधानसभेत राष्ट्रवादीचे ४ आमदार होते. 

अशाप्रकारे हे झालं इतर राज्यातील राष्ट्रवादीची संख्याबळ. या आकडेवारीवरून तरी राष्ट्रवादी इतर राज्यात खूपच कमकुवत असल्याचं दिसून येतं मग तरीही ‘राष्ट्रीय पक्षाचा’ दर्जा पक्ष कसा काय राखून आहे ?

त्याचं उत्तर म्हणजे, 

भारतात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कायम ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुकांमध्ये किमान तीन राज्यांमध्ये २ टक्के जागा जिंकून याव्या लागतात किंवा किमान ४ राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये ६% मतं आणि लोकसभेच्या ४ जागा मिळवाव्या लागतात किंवा ४ राज्यांमध्ये त्या पक्षाला राज्य पातळीच्या पक्षाचा दर्जा मिळवावा लागतो.

 हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.