म्हणून पंतप्रधान असणारे देवगौडा शिरूर तालुक्यातल्या एका हॉटेलच्या उद्घाटनाला आले होते..
झालेलं अस की तेव्हा माजी पंतप्रधान देवेगौडा महाराष्ट्राच्या प्रचारदौऱ्यावर होते. राज्याच्या २००९ सालच्या विधानसभा निवडणूक होत्या. जनता दल पक्षाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे आहेत तिथे देवेगौडा यांच्या सभा होणार होत्या.
ते दादा जाधवराव आणि विठ्ठलराव सातव या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्याला आले तेव्हा त्यांच्या कार्यक्रमाची जबाबदारी एका तरुण कार्यकर्त्यांकडे देण्यात आली होती. सकाळी विमानतळावर स्वागतापासून ते सभेपर्यंत आणि पुढच्या सभेसाठी रवाना होई पर्यंत तो कार्यकर्ता देवेगौडा यांच्या सावली प्रमाणे सोबत राहिला.
पुढचा कार्यक्रम कोल्हापूरला होता. माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या प्रचारासाठी देवेगौडा गडहिंग्लजला जाणार होते. रात्रीच्या रेल्वेने ते कोल्हापूर व तिथून गडहिंग्लज असा प्रवास होता. पुणे स्टेशन वर माजी पंतप्रधानांसाठी रेल्वे थोडी लेट सोडण्यात आली.
अशाच एका गडबडीच्या क्षणी देवेगौडांच्या जवळची बॅग आणि त्या कार्यकर्त्याची बॅग याच्यात अदलाबदली झाली. कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्याने संपर्क केला आणि तुमची बॅग चुकून माझ्याकडे आल्याचं सांगितलं.
तिथून देवेगौडा आणि त्यांची चांगली ओळख झाली.
देवगौडांनी त्याला नाव, गाव विचारलं. व्यवस्थित माणूस लक्षात ठेवला. काय करतो विचारल्यानंतर तो कार्यकर्ता म्हणाला माझं सगळं उत्तम आहे. आत्ताच नगर रोडला रांजणगाव एमआयडीसी मध्ये एक हॉटेल सुरू करतो. हॉटेल आणि १६ खोल्याचं लॉजिंग आहे.
देवेगौडा म्हणाले पुर्ण झालं की सांग मी उद्घाटनाला येतो.
माझे हॉटेल तयार झाले असून आपल्या शुभहस्ते हॉटेलचे उदघाटन व्हावे ही आमची इच्छा आहे.
माझ्या हॉटेलच्या उद्घाटनाला पंतप्रधान येणार.
अस हॉटेलच्या उद्घाटनाला पंतप्रधान येत असतो का?
हॉटेलचं उद्धाटन झालं. रांजणगावच्या माणसांना चक्कर यायचं बाकी राहिलं होतं.