राहत इंदौरींनी वाजपेयींवर खालच्या भाषेत टिका केली होती का..?
माणूस एकतर कॉंग्रेसचा असतो किंवा भाजपचा असतो, गेलाबाजार माणूस राष्ट्रवादी, सेना किंवा मनसेचा देखील असू शकतो. या पक्षीय राजकारणात आपण विसरतो की माणूस विचारांचा देखील असू शकतो. एखादा माणूस धर्मांध शक्तींच्या विरोधात असू शकतो किंवा एखादा माणूस सनातनी असू शकतो.
पक्षीय राजकारणाचा विचार करताना अशी माणसं विरोध करतात किंवा समर्थन करतात आणि मग तो अमक्या पक्षाचा समर्थक किंवा तमक्या विरोधक असा शिक्का त्यांच्यावर बसतो. दूसरी गोष्ट असते आपल्या कलेतून भूमिका घेण्याची.
आचार्य अत्रे असोत किंवा पु.ल. देशपांडे त्यांना आज आपण ओळखतो ते त्यांच्या भूमिकांमुळे. कॉंग्रेसचे विरोधक म्हणून अत्रे आपणाला जवळचे वाटण्यापेक्षा संयुक्त महाराष्ट्राची भूमिका घेणारे आणि लोकमत तयार करणारे महाराष्ट्र धर्माचे पालन करणारे अत्रे आपणाला अधिक माहित असतात.
पण गफलत होते ती एखादा माणूस आपणाला माहित नसेल तेव्हा, किसी के बाप का हिंदोस्तान थोडी ही हैं म्हणताना राहत इंदौरी मुस्लीमांच संतुष्टीकरण करणारे वाटतात. मग सोशल मिडीयातून त्यांच्या मरणावर देखील टिका होते. टिका जरूर व्हावी पण टिका करताना पुरेसं ज्ञान असणं ही प्राथमिक अट देखील असावी.
सध्या सोशल मिडीयावर विशिष्ट हेतूने राहत इंदौरी यांच्या जाण्यानंतर टिका करण्यात आली. बोलभिडूचे वाचक मंगेश निमकर यांनी आम्हाला विचारलं की खरच यात तथ्य आहे का म्हणून हा लेख.
2001: AB Vajpayee underwent a knee rplcmnt surgery.
Ever since ths GREAT Urdu poet @rahatindori claiming his shaayri 2b worth CRORES kept reciting ths disgusting couplet abt Vajpayee's manhood jst bcz he was a Hindu bachelor for life.
DON'T MISS the hyena laughter & garlanding! https://t.co/LY47TjodFR pic.twitter.com/x9vCVpbhCS
— Neta Ji (@AapGhumaKeLeLo_) August 11, 2020
या शेरमधून राहत इंदौरी यांनी वाजपेयींवर टिका केली होती. सध्या हाच शेर पाठवून ते कसे वाजपेयींच्या विरोधात होते हे सांगितलं जात आहे. भूमिका घेणारे शायर म्हणून त्यांच हे मत मान्य करायला हरकत नाही.
पण महत्वाचा मुद्दा हा आहे की, राहत इंदौरी यांच्या जाण्यानंतर त्यांच्यावर टिका करतानाा आपण वाजपेयी यांच्या जाण्यानंतर राहत इंदौरी काय म्हणाले होते याकडे दूर्लक्ष करतो. त्यासाठी खालील व्हिडीओ देखील पहायला हवा,
जुंबा तो खोल नजर तो मिला, जवाब तो देमैं कितनी बार लुटा हूं, मुझे हिसाब तो दे’
गोध्रा इथं झालेल्या हत्याकांडावर त्यांनी केलेली शायरी देखील प्रचंड वादग्रस्त ठरली होती
जिनका मसलक है रौशनी का सफरवो चिरागों को क्यों बुझाएँगेंअपने मुर्दे भी जो जलाते नहींजिंदा लोगों को क्या जलाएँगे
‘आंखो में पानी रखो, होठों पे चिंगारी रखोजिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो’
किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है!
जे आज सत्तेत आहेत, ते उद्या असणार नाहीत. ही लोकशाही आहे, सत्तेवर त्यांची मालकी नाही. स्वतंत्र होताना आणि झाल्यानंतरही सर्वच जाती-धर्माच्या रक्ताने भारताला सुरक्षित ठेवलं आहे.
हा देश घडवण्यात सगळ्यांचेच योगदान आहे. त्यामुळे हा देश कुणाच्या बापाचा नाही. असं ते ठासून सांगतात.
- भिडू ऋषिकेश नळगुणे
संदर्भ : सरफराज अहमद सोलापूर, सत्याग्रह, क्विंन्ट