कधीकाळी कृषी कायद्याला विरोध करणारे कॅप्टन आता कृषीमंत्री होवून कायद्यांना समर्थन देणार का?
काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार दिल्लीतली अशी चर्चा आता नवीन राहिली नाही. कारण राजकीय घडामोडी पाहता आता फार नवल राहिलं नाही. त्यात नव-नवीन नावांची भर पडतेय इतकंच. त्यात आता कॉंग्रेस नेते नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव चर्चेत आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग हे आता काहीतरी मोठा निर्णय घेणार हे तर स्पष्ट च होतं. त्यात ते भाजप मध्ये जाणार याची देखील चर्चा चालू होती.
त्याला कारण देखील तसंच आहे….
कालच अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे आता सगळीकडेच जोरदार चर्चा चालूये कि आता कॅप्टन निश्चितच भाजपमध्ये जाणार. याचा मोठा धक्का काँग्रेसला बसला आहे. या भेटीमध्ये अमित शहा आणि अमरिंदर सिंग यांच्यात जवळपास ४५ मिनिटं बैठक चालली होती.
"Met Union Home Minister Amit Shah in Delhi. Discussed prolonged farmers’ agitation against Farm Laws&urged him to resolve crisis urgently with repeal of the laws&guarantee MSP, besides supporting Punjab in crop diversification"-Captain Amarinder Singh: Media Advisor to Capt
— ANI (@ANI) September 29, 2021
या बैठकीत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डाही उपस्थित होते, असं बोललं जातंय पण चर्चेत नेमकी काय बोलणी झाली हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
कॅप्टन अमरिंदर सिंग हे मोदी आणि अमित शहांचे निकटवर्तीय असं मानलं जातं. जेंव्हा जेंव्हा देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत मुद्दे उपस्थित होतात तेंव्हा तेंव्हा कॅप्टन उघड-उघडपणे काँग्रेस पक्षाच्या विचारधारेबाहेर भाजपची बाजू घेतांना दिसून आलेत. इतकंच नाही तर हे देखील लपून राहिलं नाहीये कि, जेव्हाही कॅप्टन दिल्लीत जातात तेंव्हा त्यांना थेट मोदींच्या आणि शानच्या भेटीची परवानगी मिळते कुठल्या हि अडचणी शिवाय.
असो आत्ताच्या भेटीचा अर्थ काय?
अमरिंदर सिंग यांना भाजप केंद्रात कृषीमंत्री बनवण्याची चर्चा सुरु आहे.
पण जर कॅप्टन कृषीमंत्री बनले तर ते त्यांची सुरुवातीपासून असलेली कृषी कायद्याच्या विरोधाची भुमिका बदलणार का?
केंद्र सरकारचे तीनही कृषी कायदे रद्द करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले होते. केंद्राचे हे कृषी कायदे नाकारण्याचा निर्णय पंजाब सरकारने गेल्या ऑक्टोबर मध्ये घेतला होता. यासाठी १९ ऑक्टोबरला पंजाब विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं होतं. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे नवीन कृषी कायदे अधिकृतपणे नकारणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले होते.
इतकी ठाम भूमिका घेणारे कॅप्टन जर कृषीमंत्री बनलेच तर ते कृषीकायद्यांची भूमिका बदलणार का हा देखील मुख्य प्रश्न समोर येत आहे. आणि जरी कॅप्टन यांनी जर त्यांची या कृषी कायद्यांच्या विरोधातली भूमिका बदलली नाही तर पंजाबमध्ये भाजपला आणखी तोटा बसण्याची शक्यता आहे…
हे हि वाच भिडू :
- सिद्धूने फिल्डिंग लावली होती पण पंजाबचे नवीन कॅप्टन बनले चरणजितसिंह चन्नी .. !
- काँग्रेस सोडलीच तर कॅप्टन साठी दोन पर्याय आहेत.
- तेंव्हाच कळालं होत कॅप्टन आणि राहुल गांधी मध्ये काही तरी बिनसलंय