पाच मार्कांनी बोर्डावरचं नाव हुकलं होतं, तिथे आज पदसिद्ध चेअरमन म्हणून नाव झळकतय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परिक्षा काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. परिक्षांच्या ऐवजी अंतर्गत गुणांच्या आधारे विद्यार्थांना मार्क्स देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. कालच बारावीच्या परिक्षा देखील रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
भविष्याचा विचार करुन अनेक मुलं टेन्शनमध्ये आली. परिक्षेचा अभ्यास करणं, चांगले मार्क्स मिळवणं ही भविष्याची शिदोरी असते. आपल्या स्वप्नांवर कोरोनामुळे पाणी फिरणार म्हणून अनेक मुलं नैराश्यच्या गर्तेत देखील ढकलली जावू शकतात.
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहली. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड लिहतात,
“राजा तुझं पाच मार्काने बोर्ड वरचे नाव हुकलं तिसरा आलास”
परंतु ज्या शाळेत शिकलो त्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करायला मिळेल व त्याच नवोदय मधील शिक्षकांसोबत चेअरमन म्हणून काम करायला मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हत.
- IAS राजेंद्र भारूड
हे ही वाच भिडू
- ओरिसाच्या रौद्ररूपी फणी वादळाशी लढणारा मराठी IAS अधिकारी.
- इथं कोणी क्लास लावत नाही पण या गावातल्या प्रत्येक घरात IAS, IPS आहे.
- तेलंगणा गाजवणारं महाराष्ट्रीयन नाव IPS महेश भागवत