एक ई-मेल आला आणि त्याच्या ५ मिनिटानंतर दिल्लीत होत्याचं नव्हतं झालं.
पण हे सगळं घडायच्या आधी पत्रकारांना एक मेल आला होता…
“अल्लाह के नाम पर इंडियन मुजाहिदिन एक बार और हमला कर रहा है… जो चाहो कर लो. रोक सकते हो तो रोक लो”.
हि घटना घडायच्या ५ मिनिटं आधी दिल्लीच्या सर्व मोठ्या मीडिया हाऊसेसवर एक मेल आला. हा ई-मेल इंडियन मुजाहिदीनच्या नावाने करण्यात आला होता. मेल पाठवणाऱ्याचे नाव अरबी हिंदीमध्ये सांगण्यात आले होते,
तो मेल आयडी al_arbi_delhi@yahoo.com असा होता.
मिडिया हाऊसला आलेल्या या ई-मेलबाबत पोलिसांना माहिती देणार तोपर्यंत गफार मार्केटमध्ये संध्याकाळी ६.१० वाजता पहिला मोठा स्फोट झाला. पोलिसांना ई-मेलबाबत काही समजण्याआधीच दिल्लीचे हार्ट म्हणले जाणाऱ्या कॅनॉट प्लेस मध्ये दुसरा स्फोट झाला. यानंतर लगेच ६.३० वाजता बाराखंबा रोडवरील गोपालदास बिल्डिंगजवळ तिसरा स्फोट झाला.
त्यानंतर दुसऱ्या मिनिटाला म्हणजे ६.३१ वाजता सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला. त्याचवेळी ग्रेटर कैलाश १ मधील एम ब्लॉक मार्केटमधील मॅकडोनाल्डजवळही स्फोट झाला. त्याच्या ७ मिनिटांनंतर त्याच बाजारात असणाऱ्या प्रिन्स पान शॉपजवळ आणखी एक स्फोट झाला.
बॉम्ब अशा ठिकाणी ठेवले जेणेकरून त्याची तीव्रता वाढावी आणि जीवितहानी व्हावी.
गफ्फार मार्केटमध्ये पहिला स्फोट सीएनजी सिलेंडरद्वारे करण्यात आला होता, ते सिलेंडर एका ऑटोमध्ये ठेवले होते. स्फोट झाला आणि तो ऑटोने हवेत उडाला आणि विजेच्या तारावर आदळला, त्यामुळे हा स्फोटाची तीव्रता आणखी वाढली होती. प्रिन्स पान शॉपजवळचा आणि मॅकडोनाल्डजवळ स्फोटांमध्ये बॉम्ब कचऱ्याच्या डब्यात ठेवण्यात आला होता. ग्रेटर कैलाशच्या एम मार्केटमध्ये झालेला स्फोट एका कारमध्ये बॉम्ब ठेवून करण्यात आला होता.
या स्फोटांच्या मालिकेनंतर, जेव्हा मृत आणि जखमींच्या आकडा मोजला तेंव्हा कळलं कि, या बॉम्बस्फोटांमध्ये किमान ३० लोक मारले गेले आहेत आणि १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.
स्फोटांचा तपास सुरू झाला आणि एका आठवड्यात बाटला हाऊस चकमक झाली
- बाटला हाऊस प्रकरणातला डॅशिंग पोलीस अधिकारी आपल्या बदनाम लव्हस्टोरीमुळे संपला.
- कॉंग्रेसच्या या ४ मोठ्या चुकांमुळे त्यांनी ओबीसी मतदार गमावलेत.
- चंद्रकांत पाटलांच्या रूपात गुजरातला पहिला मराठी मुख्यमंत्री मिळणार असं बोललं जात होतं..
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार नेमका कुणाचा ?
- म्हणून गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनाची भाजपला मोठी भीती बसली आहे..