आंतरधर्मीय लग्नाचा आधार असणारे आर्य समाज लग्न मान्य केलं जाणार नाही : सुप्रीम कोर्ट

आंतरधर्मीय लग्न विशेषत: हिंदू-मुस्लीम लग्नाची चर्चा ही भारताच्या स्वातंत्रपूर्वीपासूनच होत आली आहे. विशेष म्हणजे जर मुलगा मुस्लीम व मुलगी हिंदू असेल तर या लग्नाची मोठ्ठी चर्चा होत असते. साधारण हिंदू-मुस्लीम लग्नात धर्मांतर करून मुस्लीम पद्धतीने निकाह लावण्यात येतो.

पण धर्मांतर करायचं नसेल तेव्हा आर्य समाज विवाह कामी येतो. शाहरूख खान-गौरी खान, नर्गिस दत्त-सुनिल दत्त, दिया मिर्झा-साहिल सांघा अशा अनेकांची लग्न या आर्य समाज पद्धतीने झाली होती.

आत्ता सर्वोच्च न्यायालयानेच एक केसबाबत निकाल देताना आर्य समाज पद्धतीचे लग्न मान्य केले जाणार नाही अस सांगितलं आहे..

काही दिवसांपूर्वी हैद्राबाद येथे राजू नामक युवकाचा खून करण्यात आला होता. सुलताना आणि नागराजू यांनी प्रेमविवाह केल्यानंतर सुलतानाच्या नातेवाईकांनी त्यांची हत्या केली होती. हे लग्न देखील आर्य समाज विवाह पद्धतीनेच करण्यात आले होते..

आर्य समाज पद्धतीचा विवाह काय असतो हे समजून घेण्यापूर्वी, याचा विवाह पद्धतीचा वापर करण्याऱ्या आंतरधर्मीय लग्नाबाबत कायदेशीर तरतूद आपण समजून घ्यायला हवी.

भारतात, विवाह आणि घटस्फोट संबंधित बाबी वेगवेगळ्या धर्मांच्या वैयक्तिक कायद्यांद्वारे नियंत्रित केल्या जातात. जसं की हिंदू पर्सनल लॉ , मुस्लिम पर्सनल लॉ. पण या अंतर्गत समान धर्माचे लोकच लग्न करू शकतात.

मात्र जेव्हा दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना लग्न करायचं असतं तेव्हा त्यांना या कायद्यद्वारे लग्न करता येत नाही. मग यासाठी १९५४ मध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट तयार करण्यात आला.

मात्र या कायद्याचा उपयोग करून लग्न करण्याची प्रोसेस ही खूप किचकट आणि वेळखाऊ असते.

या कायद्यांअंतर्गत लग्न करण्यासाठी जोडप्याला स्वतः जाऊन लग्न रजिस्टर करावं लागतं.

लग्न करण्याच्या आधी हे लग्न मर्जीने होत आहे, याची लोकांना कल्पना आहे हे माहिती करून देण्यासाठी ३० दिवस आधी एक नोटीस काढली जाते. 

त्यानंतर मग ही नोटीस पब्लिक केली जाते. त्यानंतर या लग्नावर कोणाला आक्षेप असले तर ते नोंदवण्यास सांगितलं जातं. त्यामुळं घरातून पळून आलेल्या आंतरधर्मीय जोडप्याला अशा सगळ्या प्रक्रिया करण्यास वेळ नसतो

त्यामुळं झटपट लग्नाचा ऑप्शन देणाऱ्या आर्यसमाज पद्धतीनं लग्न उरकलं जातं. 

असा आहे इतिहास

“आर्य समाज” ही हिंदू सुधारणावादी संघटना स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८७५ मध्ये स्थापन केली होती. याच आर्य समाजाच्या मार्फत ही आंतरधर्मीय लग्नं देखील केली जातात.

लग्न समारंभ हिंदू वैदिक पद्धतीनुसारच होतो. मात्र आर्य समाज मूर्ती पूजा मानत नसल्याने काही विधी थोडे वेगळे असतात.

आर्य समाज मॅरेज व्हॅलिडेशन ऍक्ट १९३७ आणि हिंदू मॅरेज ऍक्ट १९५५ या कायद्यांनुसार हे विवाह वैध ठरवले जात होते. यासाठी मुलींचं वय १८ आणि मुलाचं वय २१ असणं बंधनकारक असतं. या पद्धतीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट म्हणजे आंतरजातीय विवाह आणि आंतर-धार्मिक विवाह देखील केले जाऊ शकतात.

हिंदू, बौद्ध, जैन, शीख अशी कोणतीही व्यक्ती आर्य समाज विवाह करू शकते. मात्र जोडप्यामधील एक जण मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी किंवा ज्यू या धर्मातून येणारा असेल तर त्यांच्यावर एक अट घातली जाते.

ती म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी किंवा ज्यू धर्मातून येणाऱ्या व्यक्तीला हिंदू धर्मात कन्व्हर्ट व्हावं लागतं. 

शुद्धी प्रक्रिया करून या चार धर्मातून येणाऱ्या व्यक्तीला आर्य समाज हिंदू धर्मात घेतलं जातं. पण हे धर्मांतर कायमस्वरूपीचं धर्मांतर असतं अस नाही. लग्नापुरतं तात्पुरतं आणि सोयीचं धर्मांतर म्हणून याकडं पाहीलं जातं.  हैद्राबादच्या प्रकरणात सुलतानाने हिंदू धर्मात प्रवेश केला होता असं सांगण्यात येतं.

म्हणूनच कन्व्हर्जनचा रुल असतानाही आंतरधर्मीय जोडप्याकडून या पद्धतीला पसंती दिली जाते कारण या प्रोसेसद्वारे लग्न अगदी झटक्यात उरकलं जातं. 

अर्ध्या ते एक तासात लग्नाची प्रक्रिया पूर्ण होते. 

स्पेशल मॅरेज ऍक्टच्या प्रक्रियेसाठी लागणार ३० दिवसांचा कालावधी इथं लागत नाही. आर्यसमाजाचा हॉल बुक करून अगदी अर्ध्या तासात लग्नाची तयारी पूर्ण होते. तसेच विटनेस म्हणून फक्त २ लोकं असलं तारिक चालतात.

या सर्व कारणांमुळं आर्य समाजाच्या चालीरीतींन आंतरधर्मीय लग्न उरकली जातात.

मात्र यातील कन्व्हर्जनच्या अटीमुळे ही पद्धत विवादित मानली जाते 

तसेच आर्य समाज पद्धतीला स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली आणावं यासाठी कोर्टाचे दरवाजे देखील ठोठवण्यात आले होते. मध्यप्रदेश हायकोर्टाने काही काळ आर्य समाजाला मॅरेज सर्टिफिकेट देण्यास बंदी देखील घातली होती.

मात्र पुढे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या या निर्णयावर स्टे दिला होता.  मात्र आज एका केससंबधीत निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने आर्य समाज पद्धतीचं लग्न अमान्य असल्याचं सांगितलं आहे. 

अनेक सेलिब्रिटीजनी देखील आर्य समाज पद्धतीनं लग्न केलं आहे. त्यामध्ये महत्वाचं नाव घेता येइल ते म्हणजे शाहरुख खान आणि गौरी खान. 

आर्य समाज पद्धतीनं झालेल्या या लग्नात शाहरुख खाननं जितेंदर कुमार तुल्लि हे नाव धारण केलं होतं.

WhatsApp Image 2022 05 06 at 5.37.09 PM
source -social media

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.