हत्ती जगवायचा की राजकारण ते एकदाच ठरवा….
तो 2 ऑक्टोबर 1949 चा नेहमीप्रमाणे साधारण दिवस होता. पंतप्रधान नेहरूंनी आपल्या सवयीप्रमाणे पत्रे वाचण्यास सुरवात केली.
ते एक पत्र उघडतात आणि जपानहुन आलेले ते पत्र वाचून आश्चर्यचकित होतात. ते जपान मधील शाळकरी मुलाने लिहिलेले असते. पत्र वाचत असताना आनंदित होतात.
नेहरू आनंदित होण्यामागील कारण असते ते म्हणजे त्या शाळकरी मुलाने केलेली अद्भुत विनंती.
जपानी मुलाने नेहरूंकडे भेट म्हणून हत्तीची मागणी केलेली असते. युद्धामध्ये तेथील प्राणीसंग्रहालयातील दोन्ही हत्ती मृत पावल्याने आता तेथे एकही हत्ती नसल्याने त्या मुलांना दुःख होत असल्याने त्या शाळकरी मुलाने नेहरूंजी कडे हत्तीची मागणी केलेली असते.
“इंदिराला माझ्याकडून नव्हे तर भारतातील मुलांकडून जपानच्या मुलांना भेट समजून त्याप्रमाणे काळजी घ्या.हत्ती हा एक उदात्त प्राणी आहे. आमच्या भारतात हत्तीवर खूप प्रेम केलं जातं. हत्ती हे शहाणे, संयमशील, सामर्थ्यवान आणि सौम्य असतात.मी आशा करतो की आपण सर्व देखील हे गुण अंगींकारू”.
‘लवकर मोठे होऊ नका…मोठं झाल्यावर दुभाजकं निर्माण होत जाते..संववेदनशीलता कमी होते’
केरळातील क्रूर घटना समजल्यावर सगळ्यात आधी डोळ्यापुढे नेहरूंचे वाक्य आले…
सायलेंट व्हॅली अर्थात सैरंध्रीवन हे निलगिरी बायोस्फिअरचा सर्वात महत्वाचा भाग आहे, भारतातला शेवटचा मानवी हस्तक्षेपरहित सदाहरित वनांचा पट्टा म्हणून हे राष्ट्रीय उद्यान ओळखलं जातं.
केवळ हत्तीच्या पचनसंस्थेतून गेल्यावरच रुजतील अश्या प्रकारच्या बिया असलेल्याही काही प्रजाती आहेत, ज्या जंगलात हत्ती नसतात तिथे ह्या वनस्पती आढळत नाहीत.
मुळात हत्ती जगवायचा की माणूस? शेती ठेवायची की जंगल राखायचं असे प्रश्न शहरी मेंदूनाच जास्त पडतात..
मात्र बफर झोनच्या आत घुसून शेती केली जात असेल, रानडुक्कर, हत्ती यांच्या अन्नस्रोतावर हल्ला केला जात असेल तर ते प्राणी गावात शेतात घुसणार यात नवल नाही.
त्यावर आनंदी होऊन त्या कृतज्ञ हत्तीणीने त्यास एक पांढरे कमळ भेंट दिले.
⁃ मानस पगार +91 90490 50005
हे ही वाच भिडू
- आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी जंगली हत्तींचा कळप त्याच्या अंगणात दाखल झाला.
- सरकारी नोकरीत असलेल्या मेळघाटच्या हत्तींना पगार, सुट्ट्या इतकच काय पेन्शन पण आहे !!
- आणि, हत्तीवर बसून इंदिरा बाई पुन्हा राजकारणात आल्या.